शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांचे आंदोलन पेटले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 20:58 IST

ग्रामीण भागातील डाकसेवकांनी गेल्या १२ दिवसापासून सुरू केलेल्या देशव्यापी आंदोलनाला उग्र स्वरूप येत आहे. रामटेक येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान प्रकृतीची पर्वा न करता सलाईन लावून सहभागी झालेले मनसरचे शाखा डाकपाल हरिशंकर ढोक यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. रखरखत्या उन्हातही देशभरात सुरू असलेल्या संपादरम्यान आतापर्यंत पाच डाक कर्मचाऱ्यांचे बळी गेले असून, यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरत आहे. केंद्र शासन व डाक विभागाच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण डाक कर्मचारी ‘करो या मरो’ या जिद्दीला पेटलेले असून, हे आंदोलन आणखी भडकण्याचे चिन्हे दिसून येत आहेत.

ठळक मुद्देमनसरचे डाकपाल ढोक यांचा मृत्यू : १२ दिवसात ५ कर्मचाऱ्यांचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ग्रामीण भागातील डाकसेवकांनी गेल्या १२ दिवसापासून सुरू केलेल्या देशव्यापी आंदोलनाला उग्र स्वरूप येत आहे. रामटेक येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान प्रकृतीची पर्वा न करता सलाईन लावून सहभागी झालेले मनसरचे शाखा डाकपाल हरिशंकर ढोक यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. रखरखत्या उन्हातही देशभरात सुरू असलेल्या संपादरम्यान आतापर्यंत पाच डाक कर्मचाऱ्यांचे बळी गेले असून, यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरत आहे. केंद्र शासन व डाक विभागाच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण डाक कर्मचारी ‘करो या मरो’ या जिद्दीला पेटलेले असून, हे आंदोलन आणखी भडकण्याचे चिन्हे दिसून येत आहेत.ग्रामीण डाकसेवक समस्या निवारण मंचअंतर्गत विविध मागण्यांसाठी देशभरात संप सुरू असून, यामध्ये २.५० लाखांच्यावर कर्मचारी सहभागी आहेत. गेल्या १२ दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. नागपूर विभागातील रामटेक रिजनमधील कर्मचाऱ्यांचेही आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी हरिशंकर ढोक यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना सलाईन लावण्यात आली होती. मात्र सलाईन लावूनही ते आंदोलनात सहभागी झाले. यामुळे त्यांची प्रकृती आणखीनच खालावली व नागपूरला आणताना त्यांचा मृत्यू झाला. हरिशंकर ढोक हे या आंदोलनातील पाचवे बळी ठरले आहेत. यापूर्वी काटोल भागातील आंदोलनात सहभागी नत्थूजी शिरपूरकर यांचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला होता. याशिवाय १ जूनला सोलापूर डाक विभागातील डाकपाल डी.एल. बीरादार यांचा मोर्चादरम्यान चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला तर सांगली येथील लक्ष्मण सुहासे या कर्मचाऱ्याचाही असाच मृत्यू झाला. कर्नाटकातील टाऊनबाजार उपडाकघर येथील जीडीएस पॅकर नागेंद्र प्रसाद यांचा आंदोलनात मृत्यू झाला. आंदोलनातील काही कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. संघटनेचे सल्लागार सदस्य अ‍ॅड. डी.बी. वलथरे यांनी सांगितले की, आंदोलनात सहभागी कर्मचारी आता जिद्दीला पेटले असून शासनाने मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर हे आंदोलन आणखी पेटेल, अशा इशारा त्यांनी दिला.ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्थापन झालेल्या कमलेशचंद्र आयोगाच्या शिफारशी लागू करून कर्मचाऱ्यांचे वेतन व सुट्यासंबंधी धोरण ठरविण्यात यावे, ग्रामीण डाकसेवकांना डाक विभागात कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. यामध्ये नागपूर विभागातील ४,५०० कर्मचाऱ्यांसह राज्यातील ७० ते ८० हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Employeeकर्मचारीStrikeसंप