शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

पोलीस सतर्क असते तर टळली असती नागपुरातील हरिदासची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 23:54 IST

सक्करदरा पोलिसांनी आरोपी पितापुत्रावर कडक कारवाई करून पाळत ठेवली असती तर गरीब बॅग विक्रेता हरिदास सावरकर याला जीव गमवावा लागला नसता. बंटी आणि त्याचे वडील तीन दिवसापासून त्याच्या हत्येची योजना मूर्त रूपात आणण्याच्या तयारीत होते. ही माहिती मिळूनही पोलीस सतर्क झाले नाही.

ठळक मुद्देआईवडिलांसह कुख्यात बंटीला अटक : नागरिक प्रचंड संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सक्करदरा पोलिसांनी आरोपी पितापुत्रावर कडक कारवाई करून पाळत ठेवली असती तर गरीब बॅग विक्रेता हरिदास सावरकर याला जीव गमवावा लागला नसता. बंटी आणि त्याचे वडील तीन दिवसापासून त्याच्या हत्येची योजना मूर्त रूपात आणण्याच्या तयारीत होते. ही माहिती मिळूनही पोलीस सतर्क झाले नाही. पोलिसांच्या या ढिलेपणामुळे सक्करदरा परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. या घटनेचे पडसाद कधीही उमटू शकतात. दरम्यान पोलिसांनी आरोपी गुंड शेरखान शेख ऊर्फ बंटी याला आईवडिलासह अटक केली आहे.४५ वर्षीय हरिदासची मंगळवारी सायंकाळी ४ वाजता भांडे प्लॉट चौकात बंटी आणि त्याच्या वडिलाने हत्या केली होती. या दोघांचीही हरिदास आणि डॉ. नितीन गुडंकवार यांच्यासह अन्य चार जणांसोबत वाद होता. एनआयटीने बंटीचे अवैध दुकान तोडले होते. त्याने बिल्डरकडून दुकान खरेदी केले होते. मात्र तो बिल्डरला सोडून हरिदास आणि अन्य तिघांकडून पैसे मागत होता. मागील काही दिवसांपासूनच डॉ. गुडंकवार आणि हरिदास यांना अद्दल घडविण्याच्या तयारीत तो होता. तो याच परिसरात आपल्या आईवडिलांसोबत राहतो. हरिदासला एकटे असल्याचे पाहून बंटी आणि त्याच्या वडिलांनी हल्ला केला. त्याची आई आबेदा ही सुद्धा या दोघांनाही त्याची हत्या करण्यासाठी प्रोत्साहित करीत होती. हरिदासची पत्नी रंजना पतीला वाचविण्यासाठी मध्ये पडली असता बंटीने तिलाही शिव्या देऊन धमकावले. या हत्येमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. हरिदासचे नातेवाईक आणि नागरिकांनी सक्करदरा पोलिसांवर रोष व्यक्त केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ढिलाईमुळेच ही घटना घडल्याची तक्रार करण्यात आली आहे. सक्करदरा पोलिसांनी तपास करून तिघांनाही बुधवारी सकाळी ताब्यात घेतले.बंटी आणि त्याच्या वडिलाची भांडे प्लॉट चौकात दहशत आहे. तो नेहमी कारमध्ये शस्त्र बाळगतो. त्याने जुलै २०१९ मध्ये भांडे प्लॉट चौकातील एक जनरल स्टोअर्स उद्ध्वस्त केले होते. १८ मार्चला डॉ. गुडंकवार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. मात्र या प्रकरणात पोलिसांनी फक्त बंटीलाच आरोपी बनविले. तो १५ दिवसातच जमानतीवर बाहेर आला. बाहेर आल्यापासूनच तो हरिदासच्या हत्येच्या तयारीत होता. हरिदास, डॉ. गुडंकवार, रोहित वर्मा आणि संदीप महंत यांच्या तो सतत पाळतीवर असायचा. या चौघांवर त्याने बरेचदा हल्ला केला होता. सक्करदरा पोलिसात आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या संदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या होता. मात्र कारवाई होत नव्हती. १८ मार्चला डॉ. गुडंकवारवर प्राणघातक हल्ला केल्यानंतरही पोलिसांनी बंटीला पैसे देऊन प्रकरण मिटविण्याचा सल्ला दिला होता. अलिकडेच दोन दिवसापासून डॉ. गुडंकवार क्लिनिक उघडायला लागले होते. हरिदास त्यांना भेटायला यायचा. या दोघांवरही बंटीचा डोळा होता. गुडंकवार यांनी क्लिनिकजवळ बंटीला पाहिले होते. सुरक्षेसाठी ते क्लिनिकबाहेर निघणे टाळायचे. मात्र दुर्दैवाने हरिदास गुंडांच्या हातात लागला.कारमध्ये असायचे सशस्त्र गुंडबंटी नेहमी कारमध्ये शस्त्र घेऊन गुंडांसोबत फिरायचा. कारच्या काचांना काळी फिल्म लावली असल्याने आत कोण आहे ते कळत नसे. परिसरातील नागरिकांनी या संदर्भात सक्करदरा पोलिसांना आणि वरिष्ठांना अनेकदा बंटीच्या कारबद्दल माहिती दिली होती. मात्र पोलिसांनी एकदाही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला नाही.नुकसान भरपाईची मागणीहरिदासच्या हत्येमुळे त्याच्या कुटुंबापुढे मोठेच संकट आले आहे. जगण्याचाही प्रश्न आहे. हरिदासने हत्येच्या काही वेळापूर्वीच डॉ. गुडंकवार यांच्याशी चर्चा केली होती. व्यवसाय ठप्प पडल्याने मोठे आर्थिक संकट आल्याचे सांगितले होते. नागरिकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून घटनेची उच्चस्तरीय चौकशीची आणि हरिदासच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. झोन चारच्या डीसीपी निर्मला देवी यांनी हरिदासच्या पत्नीची भेट घेऊन आरोपींना शिक्षेपर्यंत पोहचविण्याची आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून