शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

प्रियांका गांधी महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेल्यास आनंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 8:25 PM

Nagpur News प्रियांका गांधी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय झाल्यास त्याचा आम्हाला आनंदच हाेईल. याबाबत हायकमांड याेग्य ताे निर्णय घेईल, असे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी नागपुरात स्पष्ट केले.

ठळक मुद्देकेंद्र शासनावर सडकून टीका

नागपूर : प्रियांका गांधी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय झाल्यास त्याचा आम्हाला आनंदच हाेईल. याबाबत हायकमांड याेग्य ताे निर्णय घेईल, असे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी नागपुरात स्पष्ट केले.

पटोले नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली. आठ वर्ष देश विकून देश चालविण्याचे काम केले. संविधानिक व्यवस्था संपविण्याचे काम झाले. महागाई, बेरोजगारी यावर काहीच मार्ग काढला नाही, अशी टीका त्यांनी केली. धर्म हा आस्थेचा विषय आहे. आम्हीही घरी हनुमान चालिसा पठण करतो. आमचा धर्म आम्हाला हेच शिकवतो, असा चिमटा त्यांनी राणा दाम्पत्याला घेतला. केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग सातत्याने होत आहे. मी आतापासून सांगतो की आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेवर कुठलीही कारवाई होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

भाडोत्री सोशल मीडियावर भाजपचा दररोजचा ४० कोटींचा खर्च

सोशल मीडियावर काँग्रेसची बदनामी करण्यासाठी, खोटा प्रचार करण्यासाठी भाजपने पेड यंत्रणा उभारली आहे. या भाडोत्री सोशल मीडियावर भाजप दररोज ४० कोटी रुपये खर्च करते. ते काम काँग्रेस करणार नाही. वस्तुस्थिती समाजासमोर मांडणे ही काँग्रेसची भूमिका राहिली आहे. सोशल मीडियावरील भाजपच्या भाडोत्री लोकांच्या विरोधात कसे टिकता येईल, याचे मार्गदर्शन काँग्रेसच्या सोशल मीडिया शिबिरात दिले जाणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले