शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हापूसची तहान बैगनपल्लीवर; अवकाळी पावसामुळे दर्जा घसरला

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 24, 2023 19:06 IST

Nagpur News यंदा अवकाळी पावसामुळे आंब्याचा दर्जा घसरला असून ठोकमध्ये दर्जानुसार १० ते ४० रुपये किलो भाव आहेत. रत्नागिरीचा हापूस ८०० रुपये डझन आहे.

नागपूर : अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या विक्रीत वाढ होते. सर्वाधिक विक्रीचा बैगनपल्ली आंब्याचे १८० ते २०० मिनी ट्रक (प्रत्येकी ३ ते ४ टन) कळमन्यात दररोज विक्रीसाठी येत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत आवक वाढली आहे. यंदा अवकाळी पावसामुळे आंब्याचा दर्जा घसरला असून ठोकमध्ये दर्जानुसार १० ते ४० रुपये किलो भाव आहेत. रत्नागिरीचा हापूस ८०० रुपये डझन आहे. जास्त भावामुळे नागरिकांना हापूसची तहान बैगनपल्लीवर भागवावी लागत आहे.

नागपुरात आंध्रप्रदेशातील बैगनपल्ली आंब्याला सर्वाधिक मागणी आणि पसंती असून तेलंगना आणि आंध्रप्रदेश राज्यातून येतात. प्रारंभी ५० ते ६० रुपये भाव होते. आवक वाढल्यानंतर भाव कमी झाले. बैगनपल्लीची आवक मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ज्यावर्षी चिंच उत्पादनाचे प्रमाण कमी असते, त्यावर्षी आंबे जास्त प्रमाणात येतात, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. त्यानुसार यंदा कळमन्यात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाव कमी असल्यामुळे घरोघरी आमरसाचा पाहुणचार सुरू आहे. किरकोळ बाजारात बहुतांश हातगाड्यांवर बैगनपल्लीची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. 

दशेरी, तोतापल्ली, लंगडा आंब्याची सोमवारपासून विक्रीअक्षयतृतीयेनंतर कळमन्यात सोमवारी पहिल्या दिवशी लोकल दशेरी, तोतापल्ली आणि गावरानी लंगडा आंब्याची विक्री सुरू झाली. याआधी आंध्रप्रदेशातून येणारा तोतापल्ली आंब्याची आवक संपली आहे. आता भिवापूर, मांढळ, कुही, तुमसर, गोंदिया, वरूड येथून आवक सुरू झाली आहे. कळमन्यात लोकल दशेरी आंबा ८० रुपये, गावरानी लंगडा ३० ते ६० रुपये आणि तोतापल्लीचे २० ते ३० रुपये किलो भाव आहेत. सोमवारी तिन्ही प्रकारच्या आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगिले.

केशर आंबा ६० ते ८० रुपये किलोकळमन्यात केशर आंब्याची आवक सुरू आहे. आंध्रप्रदेशातील केशर आंबा ६० ते ७० रुपये आणि गुजरातचा केशर आंबा ८० रुपये किलो आहे. गुजरातचा केशर १० किलो पॅकिंगमध्ये येतो.

रत्नागिरीचा हापूस खातोय भावहापूस हा आंब्याचा राजा समजला जातो. नागपुरात या आंब्याची खरेदी करणारा विशेष वर्ग आहे. कळमन्यात दररोज डझनाच्या १०० पेट्यांची आवक आहे. दर्जानुसार भाव ७०० ते ८०० रुपये आहेत.

आवक वाढली; भावही उतरलेसध्या बैगनपल्ली, केशर, दशेरी, तोतापल्ली, गावरान लंगडा, केशर आणि हापूस आंब्याची सुरू आहे. यंदा आवक जास्त असल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव कमी आहेत. सर्वाधिक विक्रीचा बैगनपल्लीची आवक तेलंगना आणि आंध्रप्रदेशातून होत आहे. मे महिन्यात भाव कमी होतील.आनंद डोंगरे, अध्यक्ष, कळमना फळे बाजार असोसिएशन.

टॅग्स :fruitsफळे