शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

एक रुपयात बोलणे करवून देणारा कॉईन बॉक्स कुणी पाहिला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:13 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एक काळ होता, साधारण १५-२० वर्षापूर्वी सधन कुटुंबात, शासकीय नोकरदार वर्गीयांच्या घरी एका विशिष्ट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एक काळ होता, साधारण १५-२० वर्षापूर्वी सधन कुटुंबात, शासकीय नोकरदार वर्गीयांच्या घरी एका विशिष्ट कोपऱ्यात लॅण्डलाईन फोन असायचा. घरातील ही जागा घरी येणाऱ्या आगंतुकाचे लक्ष वेधेल, अशा तऱ्हेने सजवलेली असायची. घरात लॅण्डलाईन फोन असणे, हे अतिशय प्रतिष्ठेचे समजले जायचे. मोबाईलच्या आगमनानंतर प्रतिष्ठेचे समजले जाणारे हे फोन हळूहळू गायब झाले आणि आता केवळ संस्थागत कार्यालयांतच हे फोन आपले अस्तित्त्व जपून आहेत. एवढेच नव्हे तर दूरवर असलेल्या आपल्या नातेवाईकांंशी संवाद साधण्यासाठी एक रुपया टाकून संभाषण करवून देण्यास महत्त्वाचा बिंदू असणारे कॉईन बॉक्स तर अदृष्यच झाले आहेत. हे कॉईन बॉक्स कुठे दिसत असतील तर आजच फोटो काढावा आणि आपल्या सोशल मीडियाच्या वॉलवर अपलोड करावा, कारण तो जवळपास इतिहासजमा झालेला आहे.

नागपूरची लोकसंख्या ३५ ते ४० लाखाच्या घरात आहे आणि प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या हातात, अगदी जर्जर वृद्धाच्या हातात एक मोबाईल असतोच आणि एका कुटुंबात किमान एक तरी ॲण्ड्राईड म्हणा वा स्मार्टफोन आहेच. मोबाईल येण्याच्या आधी साधारणत: २ ते ३ टक्के लोकांच्या घरी लॅण्डलाईन होते. हे लॅण्डलाईन भारत संचार निगम कंपनीचेच होते. आता मात्र, ही संख्या अर्धा टक्काही असेल, याची शाश्वती नाही. विशेष म्हणजे, याबाबतची निश्चित अशी आकडेवारीही सांगता येत नाही. कारण, आता बीएसएनएलसोबतच वेगवेगळ्या कंपन्यांनी मोबाईल फोनसह इन बिल्ट कॉलरआयडी असलेले लॅण्डलाईन फोन उपलब्ध केले आहेत. मात्र, हे लॅण्डलाईन वापरणाऱ्यांची संख्या अगदीच तोकडी आहे. विशेष म्हणजे, अगदी कुठेही म्हणजे कुठेही तुमच्या सोबत मोबाईल राहत असल्याने, एकाच जागी खिळलेला असलेला लॅण्डलाईन फोन वापरायचाच कशाला, अस प्रश्न नागरिक उपस्थित करतात.

१० ते ५ नंतर कटकट नको

आजकाल मोबाईल असल्यामुळे, कुणी कधीही फोन करून माहिती विचारतो. वैयक्तिक आयुष्यातही कार्यालयाची लुडबूड सुरू होऊन जाते. त्यामुळे, लॅण्डलाईन फोन आवर्जुन लावण्यात आलेला आहे. कुणी मोबाईल नंबर मागितला तरी त्यांना कार्यालयाच्या लॅण्डलाईनवरच फोन करा आणि सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेतच फोन करण्यास सांगतो, असे एका संस्थेच्या पदाधिकाऱ्याने या विषयावर बोलताना सांगितले.

मोबाईल असल्यामुळे लॅण्डलाईनचे कनेक्शन कापले

आता प्रत्येकाच्या हाती मोबाईल आहे. प्री-पेड कनेक्शन असल्याने बिल भरण्याचा त्रागा नाही की अधामधात फोन बिघडण्यासाठी तक्रारीची झंझट नाही. आमच्याकडे पाच वर्षापूर्वीपर्यंत लॅण्डलाईन होता. नंतर ते कनेक्शन कापल्याचे श्रीकृष्णनगरातील विनायक देशपांडे यांनी सांगितले.

..............