शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘हॅट्स ऑफ टू मिस्टर मुंढे’ : जनसामान्यांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 00:06 IST

नागपुरातील त्यांचा कार्यकाळ संपणार असला तरी त्यांची ही लहानशी ‘इनिंग’ पुढील अनेक वर्षे हृदयात कायम असेल असे म्हणणाऱ्या नागपूरकरांच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते...‘हॅट्स ऑफ टू मिस्टर मुंढे’ .

ठळक मुद्देबदली झाल्यामुळे रोष, नागपूरवर अन्याय केल्याची भावना

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘ते आले, त्यांनी काम केले आणि लोकांना जिंकले’...एखाद्या चित्रपटातील कथा शोभावी अशी त्यांची कारकीर्द राहिली. अवघ्या सात महिन्यात ते जनतेसाठी हक्काचे अधिकारी झाले. मात्र सत्ताकारणाच्या बुद्धिबळात त्यांची कार्यप्रणाली सर्वपक्षीयांना अडचण ठरत गेली आणि पटावरून अलगदपणे त्यांना बाजूला सारण्यात आले. जनसामान्यांना मात्र ते आशेचा नवीन किरण देऊन गेले. नागपुरातील त्यांचा कार्यकाळ संपणार असला तरी त्यांची ही लहानशी ‘इनिंग’ पुढील अनेक वर्षे हृदयात कायम असेल असे म्हणणाऱ्या नागपूरकरांच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते...‘हॅट्स ऑफ टू मिस्टर मुंढे’ .मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली झाल्याची बातमी एखाद्या वणव्यासारखी नागपूरकरांमध्ये पसरली आणि ‘सोशल मीडिया’वर मुंढे यांच्या समर्थनार्थ मोहिमच सुरू झाली. अनेकांनी यासंदर्भात रोष व्यक्त केला आहे. संकटाच्या काळात तुकाराम मुंढे यांच्या नियोजनामुळे उपराजधानी ‘कोरोना’शी लढू शकली. त्यांनी नियमावर चालत केवळ जनतेच्या हितासाठी काम केले. अशा कर्तव्यदक्ष अधिकाºयाची प्रशासनाला कदर नाही का, असा सवाल जनसामान्यांमधून येत आहे.जानेवारी महिन्यात नागपुरात मनपा आयुक्त म्हणून पदभार सांभाळल्यानंतरच तुकाराम मुंढे यांनी आपल्या कार्यशैलीचा परिचय नागरिकांना दिला. नागरिकांसाठीच त्यांनी जनता दरबार भरविण्यास सुरुवात केली व त्यामुळे वर्षानुवर्षे कार्यालयांमध्ये समस्या घेऊन पायपीट करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर त्यांनी ‘नागपूर लाईव्ह’ नावाचे ‘मोबाईल अ‍ॅप’ सुरू करण्यात पुढाकार घेतला व अधिकाऱ्यांच्या कामातील गतीच वाढली. कुठलीही समस्या असली तरी ती तातडीने दूर व्हायला लागली व नागपूरकरांना प्रशासनाचे बदललेले रूप पाहायला मिळाले. विशेष म्हणजे कधी नव्हे ते कचऱ्याच्या गाड्यादेखील ‘गाडीवाला आया कचरा निकाल’ असे म्हणत नियमितपणे नागरिकांच्या घरासमोर यायला लागल्या.मार्च महिन्यात ‘कोरोना’चे संकट धडकले आणि मोठ्या शहरात हाहाकार उडाला. मात्र तुकाराम मुंढे यांनी ‘क्वारंटाईन’चे नियोजन राबविले व साडेतीन महिने नागपुरात स्थिती नियंत्रणात होती. राज्य शासनाच्या यादीत नागपूर ‘रेड झोन’मध्ये नसतानादेखील मुंढे यांनी कठोरपणे ‘लॉकडाऊन’ कायमच ठेवला. शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी अशी त्यांची जनमानसात प्रतिमा निर्माण झाली.मात्र, अचानक झालेल्या या बदलीमुळे अनेक नागपूरकरांमध्ये रोष आहे. सर्वपक्षीय राजकारणाचा मुंढे बळी ठरले असल्याची नागरिकांची भावना आहे. विकास शिखराकडे झेपावत असलेल्या नागपुरात नियमांचे पालन करत योजनांची अंमलबजावणी करून घेणाºया अधिकाºयांची आवश्यकता आहे. मात्र राजकीय स्वार्थासाठी मुंढे यांना राजकारण्यांनी विरोध केला. यामुळे मुंढे यांचे नव्हे तर नागपूरचेच नुकसान झाले असल्याची भावना एका नागरिकाने ‘सोशल मीडिया’वर व्यक्त केली.

रस्त्यांवर उतरणार नागपूरकरदरम्यान, तुकाराम मुंढे यांच्यासाठी नागपूरकरदेखील रस्त्यांवर उतरणार आहेत. २७ ऑगस्ट रोजी संविधान चौकात नागरिक एकत्रित येणार असून ‘सोशल मीडिया’वर ‘व्ही सपोर्ट तुकाराम मुंढे’ ही मोहीम सुरू झाली आहे.

आता उद्यापासून ‘नो कोरोना’‘कोरोना’बाबत मुंढे यांनी केलेल्या कार्याची नागरिकांनी प्रचंड प्रशंसा केली होती. आता त्यांची बदली झाल्यानंतर राजकारण्यांना मोठा दिलासा मिळाला असेल. २४ तासात नागपूर जणू ‘कोरोनामुक्त’च होणार आहे अशा चिमटा काढणाऱ्या भावनादेखील नागपूरकरांनी व्यक्त केल्या.

‘सोशल मीडिया’वर नागरिकांच्या भावना-डॅशिंग आणि कर्तव्यतत्पर, सामान्य जनतेचा अधिकारी असलेले तुकाराम मुंढे हे खरे ‘वॉरियर’ आहेत. हा सेनापती तंबूत बसून आदेश देत नाही तर प्रत्यक्ष रणांगणावर आघाडीचा योद्धा म्हणून लढतो.

-राजकारण जिंकले प्रशासन हरले! प्रशासनात कर्तबगार, शिस्तबध्द आणि प्रामाणिक लोकांची काही गरज नाही! पुन्हा हेच सिध्द झाले.

-एक खरा अधिकारी या नागपूरला मिळाला होता पण तो पण हिसकावून टाकला. हे शहराचे दुर्दैव आहे.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेTransferबदली