शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

'त्याने' आधी विष घेतले.. नंतर गळफासही लावला... पण, सुदैवाने वाचला जीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 20:46 IST

Nagpur News हताश झालेल्या शेतकऱ्याने विषप्राशन केले. नंतर घरी जाऊन गळफास लावला. मात्र त्याच्या पत्नीने ऐनवेळी येऊन त्याचे प्राण वाचवल्याची घटना नरखेड तालुक्यात घडली.

ठळक मुद्देव्हेंटिलेटरवर काढले तब्बल २० दिवसपत्नी, वडील, डॉक्टरांच्या प्रयत्नाने मिळाले नवे जीवन

नागपूर : आर्थिक संकटामुळे हताश झालेल्या ३५ वर्षीय शेतक-याने जहाल विषप्राशन केले, गळफासही लावला. मरणाच्या दारात तो उभा होता. त्याचवेळी पत्नीचे लक्ष घराकडे गेले. बंद दारातून पती फासावर लटकताना पाहताच तिने आरडाओरड केली. शेजारीच असलेल्या वडिलाने धाव घेतली. छतावरून आत उडी मारत त्याला फासावरून काढले. बेशुद्धावस्थेतच मेडिकलमध्ये भरती केले. तब्बल २० दिवस शर्थीचे उपचार चालले आणि अखेर तो शुद्धीवर आला. पत्नी, वडील व डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे त्याला नवे जीवन मिळाले.

नरखेड तालुक्यातील एका छोट्याशा गावात ३५ वर्षीय गणेश (बदललेले नाव) पत्नी व वडिलांसोबत राहतो. त्याला तीन वर्षांचा व दोन महिन्यांच्या मुलगा आहे. गणेश व्यवसायाने शेतकरी. परंतु, एक एकरच्या शेतीवर घरातील जबाबदा-या पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे तो नैराश्येत जगत होता. ५ डिसेंबर रोजी त्याने शेतीवर जाऊन कीटकनाशक प्राशन केले. घरी आल्यावर आतून दाराला कुलूप लावले. पाळण्यातील दोन महिन्यांच्या बाळाचे लाड केले. पाळण्याची दोरी काढली. छताला दोरी बांधून गळफास लावला. त्याचवेळी पत्नी घरी आली. बंद दारातून आत डोकावून पाहिल्यावर गळफासावर लटकलेला व आचके देत असलेला पती पाहता तिने हंबरडा फोडला. मदतीसाठी ओरडायला लागली. शेजारीच असलेले गणेशचे वडील धावत येऊन घराच्या छतावर चढले. काैले बाजूला करीत आत उडी घेतली. मुलाला गळफासातून बाहेर काढले. गणेश बेशुद्ध झाला होता. शेजा-यांच्या मदतीने नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तातडीने अतिदक्षता विभागात भरती केले. डॉक्टरांचे शर्तीचे उपचार, पत्नी व वडिलांनी न सोडलेली आशा यामुळे तब्बल २० दिवसांनंतर गणेश व्हेंटिलेटरवरून बाहेर आला. गणेशला जीवनदान दिल्याबद्दल त्याच्या वडिलांनी व पत्नीने डॉक्टरांचे आभार मानले.

वाचण्याची शक्यता फारच कमी होती

विष घेतले आणि गळफासही लावून घेतला, त्यानंतर नागपुरात पोहोचण्यास लागलेले दीड ते दोन तास अशा स्थितीत रुग्ण वाचण्याची शक्यता फार कमी असते. मेडिकलमध्ये त्याला दाखल केले तेव्हा त्याची स्थिती अत्यंत गंभीर होती. विष फुफ्फुसापर्यंत पोहोचले होते. गळफासामुळे त्याला श्वासही घेता येत नव्हता. परंतु, आयसीयूच्या डॉक्टरांनी, परिचारिकांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच तो वाचू शकला.

-डॉ. मिलिंद व्यवहारे, प्रमुख आयसीयू, मेडिकल

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या