शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'च्या अंगणात तिरंगी लढत, तृप्ती सावंतांचा मनसेत प्रवेश, उमेदवारी जाहीर!
2
“राज्यात गुंडशाही, फडणवीस प्रचारात फिरतायत; रश्मी शुक्लांची तातडीने बदली करा”: संजय राऊत
3
"नॉट रिचेबल होण्यापूर्वी श्रीनिवास वनगांनी धाय मोकळून रडत उद्धव ठाकरेंची माफी मागीतली; पत्नी म्हणाली...
4
सलमान खान, झिशान सिद्दिकींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; फोन करणाऱ्याने केली 'ही' मागणी
5
मोठी बातमी: शरद पवार 'या' मतदारसंघात उमेदवार बदलणार?; जिल्हाध्यक्षांच्या दाव्याने खळबळ
6
'या' दिग्गज डिफेन्स शेअरनं केला डबल धमाका; स्टॉक स्प्लिट होणार, डिविडेंडही मिळणार
7
भाजपकडून मंत्री विजयकुमार गावित यांचे तिकीट बदलण्याच्या हालचाली; पक्षात अस्वस्थता!
8
दातृत्वाची जेथे प्रचिती, तेथे उमेदवार मिळती; भाजपचा मित्रपक्षांना ‘उमेदवार पुरवठा’, सोबत जागाही दिल्या 
9
तिकीट कापल्यानंतर श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल, पालघरमध्ये खळबळ, पोलिसांकडून शोध सुरू 
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: नंदुरबारमध्ये खोडसाळपणा; विजयकुमार गावित यांना भाजपातून फोन नाही! चौकशी सुरु
11
केरळमध्ये मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करताना मोठी दुर्घटना, १५० हून अधिक जण जखमी
12
Share Market Dhanteras 2024 : धनत्रयोदशीच्या दिवशी बाजार गडगडला; सोमवारच्या तेजीनंतर Sensex, Nifty मध्ये घसरण
13
"मलायका कशी आहे?" लोकांचा अर्जुन कपूरला मराठीत प्रश्न, अभिनेत्याने दिलं असं उत्तर की राज ठाकरेंनाही आवरलं नाही हसू
14
Ballon d’Or 2024: फुटबॉल जगतातील मानाचा पुरस्कार जिंकत Rodri नं रचला इतिहास
15
Dhanteras 2024 ५०० वर्षांनी गुरु-शनी दुर्मिळ योग: ६ राशींना दिवाळीत लॉटरीत लाभ, व्यापारात नफा; नोकरीत फायदा!
16
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती; भारताविरूद्धच्या मालिकेआधी निर्णय
17
आयुष्य उजळून टाकणारी "सराफी पेढी", नेहा शितोळेने सांगितला अशोक मामांसोबतचा विशेष अनुभव
18
Dhanteras 2024: धनत्रयोदशीला सोनं खरेदी कराल तर भविष्यात मिळतील 'हे' फायदे; गुंतवणूकीपूर्वी समजून घ्या कामाची गोष्ट
19
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२४: नवीन संबंध जुळण्याची शक्यता, मानसिक स्वास्थ्य लाभेल!
20
भाजप+ १५०; काँग्रेस १०० पार; तर शिंदेसेनेने दिले ८० उमेदवार; भाजपच्या नेत्यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी

मुसळधारचा अलर्ट, पण संततधारेने भिजले नागपूर, दिवसभरात २७ मि.मी.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 12:03 PM

सायंकाळी वाढला जाेर : पुढचे दाेन दिवस पावसाचा जाेर अधिक राहण्याची शक्यता

नागपूर : हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यात सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट देत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला हाेता. अंदाजानुसार जाेरदार हजेरी लागली नसली तरी दिवसभर चाललेली रिपरिप आणि सायंकाळी झालेल्या चांगल्या सरींनी नागपूरकरांना भिजविले.

सकाळपासून आकाशात काळ्या ढगांची गर्दी जमली हाेती. त्यामुळे दमदार हजेरी लागेल, अशी परिस्थिती हाेती. मात्र दिवसभर पावसाचा वेग वाढला नाही. मात्र दिवसभर थांबून-थांबून पावसाच्या सरी बरसत राहिल्या. यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांची तारांबळही उडत हाेती. दुपारी चार वाजताच्या दरम्यान जाेरात सरी बरसल्या. सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत १२ मि.मी. पावसाची नाेंद झाली. सायंकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा पावसाने जाेर धरला व जवळपास तासभर दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रात्री ८.३० पर्यंत पुन्हा १५ मि.मी. पावसाची भर पडली. रात्रीही ढगांचा जाेर कायम हाेता. मात्र पुढचे दाेन दिवस पावसाचा जाेर अधिक राहण्याची शक्यता वर्तवली असून ऑरेंज अलर्ट दिला आहे. स्थिती अनुकूल असल्याने आणखी काही दिवस पावसाची तीव्रता कायम राहणार असल्याचे दिसते.

पावसाची तूट १६ टक्क्यांवर

सध्या नागपूर जिल्ह्यात पावसाची तूट १६ टक्क्यांवर आहे, जी सामान्य मानली जाते. पुढच्या काही दिवसांत ही भरून निघण्याची शक्यता आहे.

पुरात वाहून बैलजोडीचा मृत्यू

भिवापूर : शेतातून घराकडे निघालेली शेतकऱ्यांची बैलजोडी पुराच्या पाण्यात वाहून गेली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारासची आहे. तुळशीदार आंभोरे, रा. मालेवाडा असे पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. मालेवाडा शिवारातून वाहणाऱ्या चिचाळा नदीपलीकडे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. मंगळवारी संध्याकाळी शेतातील कामे आटोपल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या घराकडे जाण्यासाठी सोडून दिल्या. दरम्यान, सहा बैलजोड्या नदीच्या पाण्यातून पोहत बाहेर पडत असतानाच, तुळशीदास आंभोरे यांची बैलजोडी एकमेकांना बांधून असल्यामुळे तुडुंब भरलेल्या नदीपात्रातून बाहेर पडणे कठीण झाले. यातील एक बैल नदीपात्रातच मृत्युमुखी पडला तर दुसरा नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला. दोन्ही बैलांच्या मृत्यूमुळे शेतकऱ्यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

पारडगावात वीज कोसळून शेळ्या ठार

उमरेड : पारडगाव शिवारात मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास वीज कोसळल्याने त्यात होरपळून सहा जनावरे ठार झाली. यामध्ये चार शेळ्या आणि दोन बोकडांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी शंकर नथ्थूजी राऊत यांनी शेतालगतच्या झुडपी भागात जनावरे चराईसाठी नेली होती. दरम्यान, दुपारी वाजताच्या सुमारास वीज कोसळली. यामध्ये पाच शेळ्या आणि एक बोकड ठार झाले. शंकर राऊत यांच्याकडील चार शेळ्या, तर तुकाराम राऊत आणि दीपक अरतपायरे यांच्याकडील प्रत्येकी एका बोकडाचा यात समावेश आहे. घटनेनंतर सायकी येथील तलाठी रोशन बारमासे यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परिसरात दोन मजूर होते. ते या नैसर्गिक संकटातून थोडक्यात बचावल्याचे समजते.

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊसnagpurनागपूर