शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

हेल्मेट, तरीही या कारणाने होतोय दुचाकीस्वारांनाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 20:00 IST

मोटारसायकल चालकाच्या डोक्याच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे हेल्मेट हे व्यक्तिगत सुरक्षेसाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे. परंतु अनेक दुचाकीस्वार याला गंभीरतेने घेत नाही. केवळ पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी बोगस हेल्मेटचा वापर करतात.

ठळक मुद्दे निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटचा वापर वाढला : कवच आणि आतील खिळेच ठरतात धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोटारसायकल चालकाच्या डोक्याच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे हेल्मेट हे व्यक्तिगत सुरक्षेसाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे. परंतु अनेक दुचाकीस्वार याला गंभीरतेने घेत नाही. केवळ पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी बोगस हेल्मेटचा वापर करतात. अपघात झाल्यास हेच हेल्मेट त्यांच्यासाठी धोकादायक ठरत आहे. पोलिसांनी विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करताना बोगस हेल्मेटवरही कारवाई करावी, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रस्त्यावर वर्दळीचे प्रमाण कमी आहे. परिणामी, अपघातांची संख्या कमी झाली असलीतरी ती थांबलेली नाही. तज्ज्ञाच्या मते, बनावट हेल्मेट अधिक धोकादायक ठरते. दुचाकीचा अपघात होऊन आपले डोके एखाद्या कठीण पृष्ठभागावर आदळते, तेव्हा अगदी सेकंदभरात डोके काम करेनासे होते. ताशी १० ते १०० कि.मी. वेगाने मोटारबाईक चालविणाऱ्याला होणाऱ्या अपघातात ही प्रक्रिया हानिकारक ठरते. २०० कि.मी. वेगाने जाणाऱ्या दुचाकीचा अपघात होतो तेव्हा निर्माण होणारा आघात ५०००० न्यूटन मापाच्या बलाइतका प्रचंड असतो. या आघाताने कवटीला चिरा जाणे, मेंदूत रक्तस्राव, मेंदूला धक्का, मुका मार; अशा इजा होतात. अशावेळी डोक्यावर असलेले हेल्मेट हा आघात शोषून डोक्याचे रक्षण करण्याचे कार्य करते, परंतु हेच जर हेल्मेट निकृष्ट दर्जाचे असेल तर ते तुटून जखमांमध्ये वाढ करण्यास मदत करते.दर्जेदार हेल्मेटच का?हेल्मेटची निर्मिती व रचना ही अपघातात सापडलेल्या मृतदेहाचा सविस्तर अभ्यास, जखमींची तपासणी, प्राण्यावरचे प्रयोग, बायोमेडिकल सर्वेक्षण, संगणकाच्या साहाय्याने तयार केलेला डेटा; यातून निघालेल्या निष्कर्षातून ठरविण्यात आलेले आहे. दर्जेदार हेल्मेट तयार करताना, त्याला हेल्मेटच्या आत असलेल्या मऊ थराची आघात शोषून घेण्याची क्षमता, तीव्रता किंवा तीक्ष्णता बोथट करण्याची क्षमता, हेल्मेट डोक्यापासून अलग होऊ नये यासाठी मजबूत पट्ट्या आणि हेल्मेटच्या कवचाच्या कणखरतेकडे विशेष लक्ष दिले जाते.स्वस्त मिळते म्हणून हेल्मेट घेऊ नकारस्त्यावरचे हेल्मेट स्वस्त मिळते म्हणून ते घेऊ नका, असे आवाहन जनआक्रोशचे सचिव रवींद्र कासखेडीकर यांनी केले आहे. ते म्हणाले, रस्त्यावरचे हेल्मेट हे रिसायकल केलेल्या हेल्मेटचे असू शकते. अपघाताच्यावेळी बोगस हेल्मेटचे कवच आणि आतील खिळेच धोकादायक ठरतात. अनेक प्रकरणात हेल्मेटचे खिळे डोक्यात शिरून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. म्हणूनच बनावट हेल्मेटपासून दूर रहायला हवे.बोगस हेल्मेटवर कारवाईची मोहीम‘रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये विना हेल्मेट असलेल्या चालकांची संख्या मोठी आहे. यात आता बोगस हेल्मेटमुळे गंभीर जखमी होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. निकृष्ट दर्जाचा हेल्मेटचा वाढता वापर पाहता लवकरच यावर कारवाई मोहीम हाती घेण्यात येईल.-विक्रम साळी, पोलीस उपायुक्त (वाहतूक)

टॅग्स :Accidentअपघातmotercycleमोटारसायकल