शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा, जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांची मागणी

By गणेश हुड | Updated: October 5, 2023 13:37 IST

जिल्ह्यातील ४०४ गावांतील १२ हजार ७४४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे तसेच ग्रामीण भागातील घरे, रस्ते, पाणंद रस्ते, पूल, पाळीव जनावरांचे मोठे नुकसान

नागपूर : २० सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ४०४ गावांतील १२ हजार ७४४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे तसेच ग्रामीण भागातील घरे, रस्ते, पाणंद रस्ते, पूल, पाळीव जनावरांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे सरसकट पंचनामे करून या शेतकऱ्यांची नावे नुकसानग्रस्तांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावीत. सरसकट पंचनामे करून संकटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी. अशी मागणी जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिलेल्या निवेदनातून केली.

माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वातील या शिष्टमंडळात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्षा कुंदा राऊत, सभापती प्रवीण जोध, अवंतिका लेकुरवाळे, राजकुमार कुसुंबे, मिलिंद सुटे, सदस्य रश्मी बर्वे, सदस्य, समीर उमप, महेंदूर डोंगरे, देवानंद कोहळे, माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सदस्य प्रकाश खापरे, शांता कुमरे, दुधराम सव्वालाखे, प्रकाश नागपुरे, दिनेश बंग, उज्ज्वला बोढारे, अरुण हटवार, शंकर डडमल, पं.स.सभापती महेंद्र गजबे, निशिकांत नागमोते, श्रावण भिंगारे, राहुल तिवारी,मंगला निबोने, स्वप्नील श्रावणकर, दीक्षा चनाकापुरे, रुपाली मनोहर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. नुकसानीच्या संयुक्त पंचनाम्यावर संबंधित गावाच्या सरपंचाची स्वाक्षरी नुकसानग्रस्ताच्या यादीत समावेश करावी तसेच कीड व रोगांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

बाह्ययंत्रणेची सेवा बंद करा

जिल्हा परिषदेसह शासकीय कार्यालयात बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून कामे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे बेरोजगार युवकांवर अन्याय होत असल्याने बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून सेवा घेण्याचा निर्णय शासनाने रद्द करावा. जि.प.व शासकीय कार्यालयातील रिक्त पदे नियमित भरतीतून भरण्यात यावीत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. जि.प.च्या स्थायी समितीनेही याबाबतचा ठराव शासनाकडे पाठविला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र