शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

९९ टक्के रुग्णांमधील मूळव्याध परतून येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 7:00 AM

Nagpur News लेझर शस्त्रक्रिया झालेल्या २५० रुग्णांचा अभ्यास नागपुरातील एका पाइल्स सर्जनने केला असता ९९ टक्के रुग्णांमधील मूळव्याध परतून आला नसल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देदुसऱ्या लाटेनंतर मूळव्याधीच्या रुग्णांत ३८ टक्क्यांनी वाढ

नागपूर : कोरोनाचा पहिल्या लाटेत जवळपास १५ टक्के तर, दुसऱ्या लाटेत ३५ टक्क्यांनी मूळव्याधीच्या रुग्णांत वाढ झाली. यातील लेझर शस्त्रक्रिया झालेल्या २५० रुग्णांचा अभ्यास नागपुरातील एका पाइल्स सर्जनने केला असता ९९ टक्के रुग्णांमधील मूळव्याध परतून आला नसल्याचे दिसून आले. हा शोधनिबंध नुकताच ‘इराणी जर्नल ऑफ कोलोरेक्टल रिसर्च’मध्ये प्रकाशित झाला. आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नलमध्ये भारतातून मूळव्याधीवर प्रकाशित झालेले हे पहिलेच प्रकाशन असल्याचे बोलले जात आहे.

असोसिएशन ऑफ सर्जन इंडिया (एएसआय) नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष व कोलोरेक्टल सर्जन डॉ. नीलेश जुननकर यांनी हा शोधनिबंध सादर केला. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, मूळव्याधीवर लेझर उपचार प्रणाली नवीन नाही. परंतु यात ‘लेझर हेमोरायडोप्लास्टी’ ही नवीन प्रक्रिया अधिक फायदेशीर ठरत असल्याचे अभ्यासातून दिसून आले.

-अभ्यासात ११६ महिला व १३४ पुरुषांचा समावेश

डॉ. जुननकर म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत विविध कारणांमुळे मूळव्याधीच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यातील १६ ते ८५ वयोगटातील ११६ महिला व १३४ पुरुषांवर अभ्यास केला. त्यांच्यावर ‘लेझर हेमोरायडोप्लास्टी’ उपचार करून एक वर्षाहून अधिक काळ त्याचा पाठपुरावा केला. त्यात १०० टक्के रुग्णांना शौचापूर्वीच्या आणि नंतरच्या वेदनांपासून सुटका झाली. ११.२ टक्के लोकांमध्ये शस्त्रक्रियेनंतर रक्तस्राव, इन्फेक्शन, फिस्टुला व फिशर यांसारख्या गुंतागुंत दिसून आल्या. तर ०.८ टक्के म्हणजे एका रुग्णाला पुन्हा मूळव्याध दिसून आला.

-काय आहे ‘हेमोरायॉइडल’उपचार पद्धती

डॉ. जुननकर म्हणाले, लेसरद्वारे पाइल्सला होणारा रक्तपुरवठा बंद केला जातो. यामुळे १५ ते २० दिवसांत पाइल्स आकुंचन पावतात. साधारण अर्ध्या तासाच्या या उपचार पद्धतीत कोणत्याही वेदना होत नाहीत.

-बद्धकोष्ठता व मसालेदार पदार्थांमुळे होतो मूळव्याध

मूळव्याधीचे रुग्ण वाढण्यामागे तिखट व मसालेदार पदार्थांचे अतिसेवन हे एक मुख्य कारण आहे. याशिवाय, बद्धकोष्ठता व अनुवांशिकपणा हेही एक कारण ठरते. या आजाराला दूर ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. रोज अडीच ते तीन लिटर पाणी पिणे, जेवणाच्या वेळा पाळणे, शतपावली करणे, सकाळी उठल्यावर नियमितपणे शौचास जाणे आदी उपायांची मदत होते, असेही डॉ. जुननकर म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्य