शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हरवला हेरिटेज कस्तुरचंद पार्कचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 11:01 IST

कस्तुरचंद पार्क मैदान व मैदानाच्या मध्यभागी असलेले स्मारक अत्यंत वाईट अवस्थेत आहे, असे परखड ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी ओढले.

राकेश घानोडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत्रानगरीच्या हृदयस्थळी असलेल्या ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदानाचा गौरव प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हरवला आहे. प्रशासनाने उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्रावर दिलेल्या माहितीच्या उलट परिस्थिती मैदानावर आहे. मैदान व मैदानाच्या मध्यभागी असलेले स्मारक अत्यंत वाईट अवस्थेत आहे, असे परखड ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी ओढले.

या न्यायमूर्तींनी ५ सप्टेंबर रोजी कस्तुरचंद पार्कला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, आढळून आलेली दुरवस्था त्यांनी या प्रकरणावरील आदेशात नोंदवून प्रशासनाची कानउघाडणी केली. महान दानशूर जमीनदार सर दिवान बहादूर सेठ कस्तुरचंद डागा यांनी ही जमीन खेळांकरिता दान केली होती. शहराच्या विकास आराखड्यात ही जमीन हिरव्या रंगात दर्शविण्यात आली आहे. तसेच, या मैदानाला ग्रेड-१ हेरिटेजचा दर्जा देण्यात आला आहे. असे असताना प्रशासनाने मैदानाचा गौरव जपला नाही. त्यामुळे मैदानाची वाईट अवस्था झाली आहे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले.मैदानाची दुरवस्था पाहून न्यायालयाने एप्रिल-२०१७ पासून वेळोवेळी आवश्यक आदेश दिले. परंतु, प्रशासनाने आदेशांची गांभीर्याने अंमलबजावणी केली नाही. विविध विकास कामांमुळे मैदानावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. संपूर्ण मैदान ओबडधोबड झाले आहे. मैदानावर व्यवस्थित चालता येत नाही. त्यामुळे खेळाचा विचार करता येत नाही. मैदानाचे ९० टक्के समतलीकरण झाल्याचा दावा महानगरपालिकेने केला होता. परंतु, त्यात तथ्य आढळून आले नाही. वॉकिंग, जॉगिंग व सायकल ट्रॅक आणि वृक्षारोपणाचे काम अपूर्ण आहे. मैदानाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. अतिक्रमण व मातीगोट्याचे ढिगारे हटविण्याशिवाय दुसरे कोणतेच ठोस काम झाले नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.आदेशातील इतर निरीक्षणे१ - कस्तुरचंद पार्कचा उपयोग मुंबईतील ओव्हल मैदानासारखा झाला पाहिजे. त्यासाठी कस्तुरचंद पार्कचा गौरव परत आणणे आवश्यक आहे. तसेच, सामान्य नागरिकांना या मैदानावर खेळता आले पाहिजे.२ - मैदानावरील खोदकामात ऐतिहासिक तोफ आढळून आल्या. परंतु, जनतेला ऐतिहासिक मूल्ये व भव्यता दाखविण्यासाठी त्या तोफ मैदानावर प्रदर्शित करण्यात आल्या नाहीत.३ - स्वच्छतागृहे, प्रवेशद्वार, ड्रेनेज लाईन इत्यादी कामे अर्धवट आहेत. ४ कोटी ५२ लाख रुपये निधीतून ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा चुकीचा आहे.४ - मैदानावरील स्मारकाला जागोजागी भेगा पडल्या आहेत. बांधकाम फुटले आहे. खिटक्या तुटल्या आहेत. स्मारकाचे एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही. स्मारक जीर्ण होत आहे.

 

टॅग्स :Kasturchand Parkकस्तूरचंद पार्क