शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महामार्ग बनले मृत्यूचे सापळे : १४ महिन्यांत १५०० हून अधिक अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:41 IST

महामार्ग पोलिसांच्या नागपूर विभागांतर्गत राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१८ सालापासून १४ महिन्यांत थोडेथोडके नव्हे तर १५०० हून अधिक अपघात झाले. यात १३०० हून अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. अपघातांची सरासरी काढली असता दिवसाला चार अपघात झाले असून यात तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्ग आहे की मृत्यूचा मार्ग असे म्हणण्याची वेळ आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे१३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामार्ग पोलिसांच्या नागपूर विभागांतर्गत राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१८ सालापासून १४ महिन्यांत थोडेथोडके नव्हे तर १५०० हून अधिक अपघात झाले. यात १३०० हून अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. अपघातांची सरासरी काढली असता दिवसाला चार अपघात झाले असून यात तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्ग आहे की मृत्यूचा मार्ग असे म्हणण्याची वेळ आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महामार्ग पोलीस प्रादेशिक विभागाकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. २०१६ सालापासून ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत विभागाच्या हद्दीत किती अपघात झाले, किती लोकांचा अपघातात मृत्यू झाला, या पोलिसांची संख्या किती होती, इत्यादी प्रश्न त्यांची विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत महामार्गांवर १ हजार ५६४ अपघात झाले. यात १ हजार ३४१ नागरिकांचा मृत्यू झाला. २०१९ मधील दोन महिन्यांतच ३७६ अपघातांत १९९ जण मरण पावले. तर १ हजार १५ जण जखमी झाले. बहुतांश अपघात हे वाहनचालकांचा हलगर्जीपणा, भरधाव वेग, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, नशा करून वाहन चालविणे, नियमांचा भंग करणे या कारणांमुळे झाले.३८ महिन्यांत ३,६५९ बळी२०१६ पासूनची आकडेवारी पाहिली तर ३८ महिन्यांत नागपूर विभागातील महामार्गांवर ३ हजार ५८४ अपघात झाले. त्यात ३ हजार ६५९ नागरिक मरण पावले व ४ हजार २ नागरिक गंभीर जखमी झाले. याकालावधीत चार पोलिसांचा कर्तव्यावर असताना अपघातात मृत्यू झाला.मृत्यूचे पाच ‘स्पॉट्स’महामार्ग पोलीस प्रादेशिक विभागाच्या अधिपत्याखाली एकूण १६ महामार्ग मदत केंद्र येतात. या हद्दीत पाच ठिकाणी सर्वाधिक अपघात झाले आहेत. या ‘स्पॉट्स’वर सूचना फलकदेखील लावण्यात आले आहेत.१० अधिकाऱ्यांच्या भरवशावर कारभारमहामार्ग प्रादेशिक विभाग पोलिसांचा कारभार १० पोलीस अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. विभागाकडे ३४१ पोलीस कर्मचारी असून मोटार सायकल व जीप मिळून केवळ ४८ वाहने आहेत.

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गDeathमृत्यूRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता