शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

रेस्टॉरंट, धाब्यावर दारू रिचवतात अन् धुंदीत गाडी चालवून लोकांना चिरडतात

By नरेश डोंगरे | Published: June 20, 2024 7:14 PM

- हिट ॲन्ड रन : एक्साईजची अर्थपूर्ण डोळेझाक, कारवाईच्या नावाने नुसतीच खानापूर्ती

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : शहरात असू दे किंवा शहराबाहेर परवाना नसतानाही अनेक रेस्टॉरंट, धाब्यावर बिनधास्त दारू मिळते. तेथे दारू रिचविल्यावर बेदरकारपणे गाडी चालविली जाते. त्यामुळे नंतर हिट ॲन्ड रनचे प्रकार घडतात. शहरात सध्या असे प्रकार वाढले आहेत. कुणाचा जीव जात आहे तर कुुणी वेदना घेऊन जगत आहेत. मात्र, या प्रकारासाठी जबाबदार असलेल्या पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने डोळ्यावर अर्थपूर्ण झापड लावून घेतले आहे. कारवाईच्या नावाखाली ही मंडळी नुसतीच खानापूर्ती करीत असल्याची चर्चा आहे.

शहराच्या आत आणि बाहेरच्या मार्गावर जागोजागी रेस्टॉरंट आणि धाबे वाढले आहेत. त्यातील अनेक ठिकाणी परवाना नसताना दारू उपलब्ध करून दिली जाते किंवा दारू पिण्याची व्यवस्था करून दिली जाते. त्यामुळे अशा ठिकाणी तरुण-तरुणींची मोठी गर्दी दिसून येते. उशिरा रात्रीपर्यंत तेथे यथेच्छ दारू पिल्यानंतर ही मंडळी रेस लावल्यासारखी वाहने चालवितात. त्यामुळे अपघात होतो. त्यानंतर दोष कुणाचा आणि शिक्षा कुणाला, असा प्रकार घडतो. निरपराध व्यक्तींचा जीव जातो. त्यांच्या नातेवाइकांना आयुष्यभर सलेल अशी जखम होते आणि अपघात करणारी बेजबाबदार मंडळी पोलिसांकडून खानापूर्ती झाल्यानंतर काही तासांतच जामिनावर बाहेर येते. अपघात कितीही गंभीर असला तरी अलीकडे त्यात जामीन मिळतो, हे सर्वांना माहिती झाले म्हणून की काय, काही वाहनचालक मुद्दामहून दारूच्या नशेत बेदरकारपणे वाहन चालवितात.

परवाना नसताना कुठे दारू उपलब्ध करून दिली जात असेल किंवा दारू पिण्याची सोय करून दिली जात असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांप्रमाणेच राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे. मात्र, ही मंडळी या गंभीर प्रकाराकडे अर्थपूर्ण डोळेझाक करीत असल्याचे जाणवते. या संबंधाने उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता आमच्या नियमित कारवाया सुरू असतात, असे ते म्हणतात.तरच अपघाताला आळा घालता येईल

सिग्नल बंद असताना आणि सुरू असलेल्या सिग्नलकडून दुसरे वाहनचालक येताना दिसत असूनही दारूच्या नशेत असलेले काही बेदरकार वाहनचालक आपली गाडी पुढे दामटतात. त्यांच्याकडे सहज बघितले तरी ते गाडीतूनच 'क्या देख रहा...' अशी उर्मट विचारणा करून गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करतात. शहरात असे प्रकार जवळपास रोजच घडतात. 'जाऊ द्या, कशाला कटकट करायची', असे स्वत:ला समजावत अनेक वाहनचालक निघून जातात. अशा दारूड्या वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी रात्रीच्या वेळी शहराच्या आत आणि बाहेर, रस्त्यारस्त्यावर ड्रंक न ड्राईव्ह कारवाईच्या धडक मोहिमेची गरज आहे. असे झाले तरच अपघाताला आळा घालता येईल. 

टॅग्स :Accidentअपघात