शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
3
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
4
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
5
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
6
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
7
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
8
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
9
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
10
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
11
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
13
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
14
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
15
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
16
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
17
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
18
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
19
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
20
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."

अनुसूचित जातीच्या प्रत्येक कुटुंबाला घर

By admin | Published: February 07, 2016 3:03 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष राज्य सरकारतर्फे साजरे केले जात आहे. राज्यातील अनुसूचित जातीच्या अडीच लाख कुटुंबांकडे स्वत:चे घर नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : जि.प. मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरणनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष राज्य सरकारतर्फे साजरे केले जात आहे. राज्यातील अनुसूचित जातीच्या अडीच लाख कुटुंबांकडे स्वत:चे घर नाही. २०१९ पर्यंत या प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर दिले जाईल. त्यासाठी राज्य सरकारने निधीचे नियोजन केले आहे. घर निर्मितीसाठी विशेष सेल तयार करण्यात आला आहे. यासोबतच ग्राम विकास खात्यांतर्गत यंत्रणा उभी केली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.नागपूर जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी अनावरण करण्यात आले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. जोगेंद्र कवाडे, महापौर प्रवीण दटके, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर, आ. प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारने दीक्षाभूमीच्या विकासासाठी १२ कोटी रुपये मंजूर केले असून त्यापैकी ९ कोटी रुपये दिले आहेत. मात्र, एवढ्याने होणार नाही. आपण नुकतेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांसी चर्चा केली असून दीक्षाभूमीच्या विकासाचा १५० कोटी रुपयांचा आराखडा केंद्र सरकारला पाठविण्यात येईल. या आराखड्याला मंजुरी देण्याचे आश्वासनही केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे. गेली अनेक वर्षे रखडलेला इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाले. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे देश विकासाच्या दिशेने जात आहे. जगाताली सर्व संविधानात भारतीय संविधानाचा पहिला क्रमांक लागतो. शेवटच्या माणसाला न्याय देण्याची ताकद संविधानात आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.मध्यप्रदेशने कृषी क्षेत्रात क्रांती केली आहे. मध्यप्रदेशचा पॅटर्न पाहिला असता त्यांनी मोठ्या प्रमाणात शेततळ्यांची निर्मिती केल्याचे दिसून आले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ५ लाख शेततळे देण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच ठिंबक सिंचनाचा बृहत् आराखडा तयार केला जात आहे. ठिंबक सिंचनासाठी लागणारे कृषी साहित्य महागात पडते. त्यामुळे येत्या काळात या साहित्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून किंमती ५० टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी आ. सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, आशीष देशमुख, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, मल्लिकार्जून रेड्डी, नागो गाणार, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मिहानचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे, जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर, संध्या गोतमारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा साकारणारे मूर्तीकार शंतनु इंगळे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर यांच्या कार्यकाळात पुतळा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असा आवर्जून उल्लेख पालकमंत्री बावनकुळे व जि.प. अध्यक्ष सावरकर यांनी केला. या सोहळ्यात हार तुऱ्याचा खर्च न केल्यामुळे वाचलेल्या २५ हजार रुपयांचा धनादेश जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.(प्रतिनिधी)नागपूर जिल्हा हागणदारीमुक्त करूराज्यातील पाच हजार गावे हागणदारी मुक्त करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. येत्या काळात नागपूर जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे ध्येय असून त्यासाठी शासकीय यंत्रणेने कामाला लागण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.महिला बचत गटांसाठी मॉलमहिला बचत गटांचे मॉल उभारण्याची योजना सरकारने आखली आहे. यासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत नागपूर जिल्हा परिषदेने सर्वात पहिला प्रस्ताव पंडित बच्छराज व्यास चौकात असलेल्या जिल्हा परिषदेच्या जागेचा दिला आहे. त्याला मंजुरी देण्यात आली असून आणखी एक प्रस्ताव जिल्हा परिषदेने सादर करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. मिहानमध्ये लॉजिस्टीक पार्कला मंजुरी देण्यात आली असून १५०० कोटींची गुंतवणूक होत आहे. यातून युवकांना रोजगार मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.