शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

‘पापा टेन्शन मत लो, मै ठिक हूं’, म्हणणाऱ्या मुलीचा मृत्यू होतोच कसा?, वडिलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 13:06 IST

अख्खे नर्सिंग कॉलेज हळहळले

नागपूर : बुधवारी सकाळी शितलने वडील राजकुमार यांना फोन करून बरे वाटत नसल्याचे सांगितले. मेडिकलमध्ये भरती होत असल्याचीही माहिती दिली. परंतु ‘पापा टेन्शन मत लो, मै ठिक हूं’, असे सकाळी म्हणणाऱ्या मुलीचा रात्री मृत्यू होतोच कसा, असा प्रश्न तिच्या वडिलांनी उपस्थित केला. जम्मू काश्मीरहून नागपूरला आलेल्या आई, वडील आणि छोट्या भावाला अश्रू आवरणेही कठीण झाले होते.

शितल जम्मू काश्मीरमधील. त्यातच तिचा मनमिळावू स्वभाव. यामुळे तिची मैत्री अंतिम वर्षातील विद्यार्थिनीसोबतही होती. बुधवारी रात्री अचानक झालेल्या तिच्या मृत्यूने अख्खे कॉलेज हळहळले. जम्मू काश्मीरमधून तिचे आई-वडिल आणि छोट्या भावाने कसेतरी करून गुरुवारी नागपूर गाठले. संपूर्ण प्रवास त्यांचा हुंदके देत गेला. नागपूरला आल्यावर ते शवविच्छेदन गृहाच्या बाहेर रडत बसले होते. त्यांना सांभाळण्यासाठी नर्सिंग कॉलेजचे शिक्षक आणि विद्यार्थी होते. वडील राजकुमार यांना बोलते केल्यावर ते म्हणाले, ५ जुलै रोजी शितलचा फोन आला. तेव्हा ती भरती होत असल्याचे सांगत ‘टेन्शन’ न घेण्यासही सांगितले. परंतु मुलीच्या आवाजात झालेला बदल आम्हाला जाणवला. आम्ही जम्मू काश्मीरमधून नागपूरला येण्याच्या तयारीला लागलो. परंतु रात्रीच तिच्या मृत्यूची माहिती मिळाली. आम्ही लगेच नागपूरसाठी निघालो.

जम्मू-काश्मीरच्या नर्सिंग विद्यार्थिनीचा नागपूर मेडिकलमध्ये मृत्यू

- शिक्षक, विद्यार्थी सर्वच रडले

शवविच्छेदनानंतर शितलचा मृतदेह नर्सिंग कॉलेजमध्ये आणण्यात आला. तेव्हा मोठ्या संख्येत नर्सिंग विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. दोन मिनिटे श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी शिक्षकांसोबतच उपस्थित सर्व विद्यार्थी हुंदके देत होते. उपस्थित प्रत्येक जण रडत होता.

- मदतीसाठी अनेकांचे हात आले पुढे

शितलचे वडील शेतकरी. जम्मू काश्मीरला मुलीचा मृतदेह कसा न्यावा, हा त्यांचासमोर प्रश्न होता. त्यावेळी कॉलेजचे शिक्षक व नर्सिंग संघटनेचे कार्यकर्ते सरसावले. त्यांनी रुग्णवाहिकेतून जम्मू काश्मीरला मृतदेह नेण्याची सोय उभी केली. सायंकाळी ६ वाजता तिच्या नागपूर-जम्मू काश्मीरच्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात झाली.

- वसतिगृहातील विद्यार्थी वाऱ्यावर!

बी.एस्सी. नर्सिंग कॉलेजला २०० विद्यार्थी असून एम.एस्सी. नर्सिंग कॉलेजला ५० विद्यार्थी आहेत. यातील जवळपास १५ टक्के विद्यार्थी हे महाराष्ट्र बाहेरील आहेत. मुला-मुलींच्या वसतिगृहात वॉर्डन नाही. स्वच्छ पाण्याची सोय नाही. स्वच्छतागृहाची सफाई होत नाही. सर्वत्र घाण व झुडुपांमुळे साप कधी कुठून निघेल याची भीती राहते. त्यात महिन्याभरापासून वाढलेल्या डासांच्या प्रादुर्भावामुळे कधी कोणता आजार होईल, याचा नेम नसल्याचा विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. आम्हाला वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Healthआरोग्यStudentविद्यार्थीDeathमृत्यूnagpurनागपूर