शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
3
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
4
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला
5
मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईच्या संघाला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती
6
हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह 'खतम'! मुलीचाही मृत्यू; इस्रायली लष्कराचा मोठा दावा
7
Investment Tips : गुंतवणूकदारांसाठी आली सुरक्षित गुंतवणुकीची संधी, सरकार उभारणार २० हजार कोटी, तुम्हालाही संधी मिळणार
8
IND vs BAN, 2nd Test Day 2 : एकही चेंडू नाही फेकला अन्.. ९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
10
Som Pradosh 2024: पितृपक्षात सोम प्रदोष व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ; अवश्य करा 'ही' एक कृती!
11
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
12
फवाद खानच्या पाकिस्तानी सिनेमाला भारतात बंदीच! 'द लीजेंड ऑफ मौला जट' प्रदर्शित होणार नाही, कारण...
13
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
14
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
15
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
16
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
17
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
18
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
19
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
20
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?

पटोलेंनी भंडारा-गोंदियात किती प्रकल्प आणले? मुख्यमंत्र्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 12:01 AM

काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी भंडारा-गोंदियात किती प्रकल्प आणले हे आधी सांगावे? असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नाकर्त्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. पटोलेंचा पक्ष बदलूपणा साऱ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यांना नागपुरात काहीच साध्य होणार नाही. भंडारा-गोंदियाचे हे पार्सल परत करावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर सभेत केले.

ठळक मुद्देनाकर्त्या कारभाराचा घेतला समाचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी भंडारा-गोंदियात किती प्रकल्प आणले हे आधी सांगावे? असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नाकर्त्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. पटोलेंचा पक्ष बदलूपणा साऱ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यांना नागपुरात काहीच साध्य होणार नाही. भंडारा-गोंदियाचे हे पार्सल परत करावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर सभेत केले.केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी शहीद चौक येथे सोमवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. नाना पटोले हे एका पक्षाकडून निवडणूक लढतात, मग तीन वर्षांनी त्याच पक्षावर टीका करत दुसरीकडे प्रवेश करतात. त्यानंतर परत तोच क्रम सुरू असतो. इतके वेळा आमदार आणि खासदार राहूनदेखील त्यांनी विकास केला नाही. नितीन गडकरी यांनी नागपूरचा कायापालट केला. याअगोदर ज्या नेत्यांना नागपूरच्या जनतेने दिल्लीत पाठविले व मंत्रिपद मिळवून दिले. त्यांनी दिल्लीत केवळ पक्षश्रेष्ठींसमोर ‘मुजरा’च घालत जीहुजूरी केली व त्यातच धन्यता मानली. काँग्रेसमुळेच भ्रष्टाचाराची परंपरा सुरू झाली. मतांच्या राजकारणामुळे काँग्रेसचे नेते देशाला विसरले आहेत. म्हणूनच काँग्रेसने जाहीरनाम्यात जम्मू-काश्मिरातील सैन्य परत घेऊ, सैन्यांचे विशेष अधिकार काढून टाकू, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणारे कलम १२४ (अ) काढून टाकू, असा उल्लेख केला आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावरदेखील टीकास्त्र सोडले. २००८ साली मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर कुठलीही ठोस कारवाई केली नाही. अगोदरच्या पंतप्रधानांनी कणाहीन असल्यासारखी भूमिका घेतली होती. यंदाची निवडणूक ही विकासासोबतच देशाच्या अस्मितेचीदेखील आहे, असे ते म्हणाले. यावेळी आ. विकास कुंभारे, आ. गिरीश व्यास, उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी महापौर अर्चना डेहनकर, प्रवीण दटके, नगरसेवक दयाशंकर तिवारी, बंडू राऊत, शिवसेनेचे मंगेश कडव, गजेंद्र पांडे प्रामुख्याने उपस्थित होते.दोन वर्षांत गोसेखुर्द पूर्ण होणारमी लहानपणापासून गोसेखुर्द प्रकल्पाचे नाव ऐकत होतो. मात्र २०१४ पर्यंत त्याचे संथगतीने काम सुरू होते. २०१४ साली या प्रकल्पामुळे ८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती. सध्या हे प्रमाण ५८ हजार हेक्टर इतके असून, पुढील वर्षी १ लाख हेक्टर सिंचनक्षेत्र यामुळे निर्माण होईल. पुढील दोन वर्षांत गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019