शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
2
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
3
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
4
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
5
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
6
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
7
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
8
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
9
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
10
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर
11
आता इस्रायल-इराण संघर्ष पेटणार...! समोर आला नेतन्‍याहू यांचा 'रिव्हेंज प्लॅन', जाणून अंगावर शहारा उभा राहील
12
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
13
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
14
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
15
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
16
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
17
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
18
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
19
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
20
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट

Coronavirus; लाॅकडाऊनने कोंडीत सापडलेला शेतकरी जगेल कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 9:10 AM

Coronavirus ग्रामीण भागात एप्रिल महिन्यापासून संचारबंदी लागू केली आहे. आता खरीप हंगाम तोंडावर असताना व्यापारी वर्गासह शेतकरीसुद्धा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. दोन महिने लॉकडाऊन झाल्यानंतर जून महिन्यात काय पहायला मिळेल, याचा अद्यापही थांगपत्ता नाही.

ठळक मुद्दे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडलीव्यापारीही आर्थिक संकटात

अमोल काळे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर: कोरोनाने जग थांबले. लॉकडाऊनने शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला. त्यामुळे येथील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. ग्रामीण भागात एप्रिल महिन्यापासून संचारबंदी लागू केली आहे. आता खरीप हंगाम तोंडावर असताना व्यापारी वर्गासह शेतकरीसुद्धा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. दोन महिने लॉकडाऊन झाल्यानंतर जून महिन्यात काय पहायला मिळेल, याचा अद्यापही थांगपत्ता नाही.

खरीप हंगामात बी-बियाणे आणि खतांसाठी पैशांची जुळवाजुळव करताना शेतकरी त्रस्त झाला आहे. तालुक्यातील मजूरवर्ग मिळेल तिथे काम शोधत आहे. इकडे खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. काटोल तालुक्याची लोकसंख्या ही दोन लाखांच्या जवळपास आहे. यातील ६० टक्के लोक शेतीवर निर्भर आहेत. त्यामुळे कोरोनामुळे डबघाईला उभारी देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

कर्जासाठी भटकंती

गत हंगामातील बोनससुद्धा अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकित राहिले. पात्र, शेतकरी दिवस-रात्र एक करीत कर्जाकरिता सरसावले आहेत. हाती पैसा नसल्याने मिळेल तिथून पैशाची जमवाजमव सुरू आहे.

बी-बियाणे व खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी त्रस्त आहे. गतवर्षी अवकाळी पावसामुळे शेतीमालाचे नुकसान झाले. लॉकडाऊनमुळे शेतीमाल बेभाव विकावा लागला. हीच परिस्थिती आताही कायम आहे.

-बाबाराव काळे, शेतकरी, चिखली (मैना)

लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले. वेळोवेळी बदलणाऱ्या निर्बंधांमुळे आमच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. नवीन मालाची आवक थांबल्याने व ग्राहक संतुष्ट होत नसल्याने व्यापार बुडतो आहे.

गौरव ठाकरे, दुकानदार

गतवर्षी सततच्या पावसाने खरीप हंगामात शेतकऱ्यांना फटका बसला. रबी हंगामात शेतकरी सावरत नाही तोच त्याला लॉकडाऊनच्या निर्बंधांना सामोरे जावे लागले. बाजार भाव हवा तसा मिळाला नाही.

- सुरेश कन्नाके

तालुका कृषी अधिकारी, काटोल

टॅग्स :Farmerशेतकरी