शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
2
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
3
संपादकीय: अभिजात मराठी!
4
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
5
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
6
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
7
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
9
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
10
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
11
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
12
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
13
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
15
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
16
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
17
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
18
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
19
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
20
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात

लाॅकडाऊनने कोंडीत सापडलेला शेतकरी जगेल कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:08 AM

अमोल काळे काटोल : कोरोनाने जग थांबले. लॉकडाऊनने शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका ...

अमोल काळे

काटोल : कोरोनाने जग थांबले. लॉकडाऊनने शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला. त्यामुळे येथील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. ग्रामीण भागात एप्रिल महिन्यापासून संचारबंदी लागू केली आहे. आता खरीप हंगाम तोंडावर असताना व्यापारी वर्गासह शेतकरीसुद्धा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. दोन महिने लॉकडाऊन झाल्यानंतर जून महिन्यात काय पहायला मिळेल, याचा अद्यापही थांगपत्ता नाही. खरीप हंगामात बी-बियाणे आणि खतांसाठी पैशांची जुळवाजुळव करताना शेतकरी त्रस्त झाला आहे. तालुक्यातील मजूरवर्ग मिळेल तिथे काम शोधत आहे. इकडे खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. काटोल तालुक्याची लोकसंख्या ही दोन लाखांच्या जवळपास आहे. यातील ६० टक्के लोक शेतीवर निर्भर आहेत. त्यामुळे कोरोनामुळे डबघाईला उभारी देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

कर्जासाठी भटकंती

गत हंगामातील बोनससुद्धा अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकित राहिले. पात्र, शेतकरी दिवस-रात्र एक करीत कर्जाकरिता सरसावले आहेत. हाती पैसा नसल्याने मिळेल तिथून पैशाची जमवाजमव सुरू आहे.

---

बी-बियाणे व खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी त्रस्त आहे. गतवर्षी अवकाळी पावसामुळे शेतीमालाचे नुकसान झाले. लॉकडाऊनमुळे शेतीमाल बेभाव विकावा लागला. हीच परिस्थिती आताही कायम आहे.

-बाबाराव काळे, शेतकरी, चिखली (मैना)

--

लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले. वेळोवेळी बदलणाऱ्या निर्बंधांमुळे आमच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. नवीन मालाची आवक थांबल्याने व ग्राहक संतुष्ट होत नसल्याने व्यापार बुडतो आहे.

गौरव ठाकरे, दुकानदार

---

गतवर्षी सततच्या पावसाने खरीप हंगामात शेतकऱ्यांना फटका बसला. रबी हंगामात शेतकरी सावरत नाही तोच त्याला लॉकडाऊनच्या निर्बंधांना सामोरे जावे लागले. बाजार भाव हवा तसा मिळाला नाही.

- सुरेश कन्नाके

तालुका कृषी अधिकारी, काटोल