शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नागपुरात शेकडो ओबीसी बांधव २५ डिसेंबरला स्वीकारणार बौद्ध धम्म; दीक्षाभूमीवर सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 21:01 IST

येत्या २५ डिसेंबरला शेकडो ओबीसी बांधव एकाच वेळी नागपूर आणि मुंबईला बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत.

ठळक मुद्देपरिवर्तनातून स्वीकारला बुद्धाचा मार्ग

आॅनलाईन लोकमतनागपूर : ओबीसी बांधव बौद्ध धम्माकडे आरक्षणाचे आमीष किंवा ‘ब्रेन वॉशिंग’ केल्यामुळे वळले नाही. आधी बाबासाहेब आणि बुद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आणि पटलं म्हणून त्याचा स्वीकार करतो आहोत. बौद्ध धम्माइतके सुस्पष्ट समतावादी तत्त्वज्ञान जगात कुठेही नाही व त्याच मार्गाने आम्हाला जावे लागणार आहे. या परिवर्तनातूनच ओबीसी बांधव धम्माचा स्वीकार करीत आहेत, अशी भावना प्रा. रमेश राठोड यांनी व्यक्त केली.येत्या २५ डिसेंबरला शेकडो ओबीसी बांधव एकाच वेळी नागपूर आणि मुंबईला बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रसह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशातील बंजारा, हलबा, मातंग, तेली, माळी, कुणबी, अग्रवाल अशा विविध जातींमधील ओबीसी बांधवांचा समावेश आहे. प्रा. राठोड यांनी नागपुरात दीक्षाभूमीवर होणाऱ्या या दीक्षा समारोहाबाबत पत्रपरिषदेत माहिती दिली. दुपारी १२ वाजता धम्मदीक्षा समारोहापूर्वी संविधान चौकाकडून दीक्षाभूमीकडे धम्मरॅली काढली जाईल. त्यानंतर २ वाजता प्रत्यक्ष दीक्षा सोहळ्याला सुरुवात होणार आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष व महाबोधी महाविहार मुक्ती संग्रामाचे धम्मसेनानी भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई व लद्दाखचे भदंत संघसेना हे ओबीसी बांधवांना धम्माची दीक्षा देतील. यावेळी प्रा. जैमिनी कडू, डॉ. रुपाताई बोधी-कुळकर्णी, संतोष भालदार व हरिकिसनदादा हटवार आदी मान्यवर परिवर्तित बौद्धांचे मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत बुद्धभूमी येथे याचवेळी हा सोहळा होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनीही ओबीसी बांधवांच्या धर्मांतरास पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.कीर्तनातून बुद्ध सांगणारे हरिकिसनदादाहरिकिसनदादा हटवार कीर्तनकार व भारुडकार म्हणून प्रसिद्ध होते. वारकरी म्हणून कार्य करताना बुद्धाची ओळख पटली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या चळवळीत सामील झाले. पुढे त्यावर सखोल अभ्यास करून १९६७ साली संपूर्ण कुटुंबासह बौद्ध धम्माचा स्वीकार केला. तेव्हापासून भारुड कार्यक्रमाच्या माध्यमातून ते बुद्धाचे तत्त्वज्ञान लोकांना सांगत आहेत. अनेक वेळा लोकांनी दगडही मारले. आता मात्र त्यांना माझे सांगणे पटत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७