शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

उपचाराविनाच खराब ‘व्हाॅल्व्ह’सह मृत्यूच्या दाढेत जगताहेत शेकडो रुग्ण

By सुमेध वाघमार | Updated: September 12, 2023 11:33 IST

जनआरोग्य योजनेत हृदयाच्या कृत्रिम ‘टिश्यू व्हाॅल्व्ह’चा खर्चच बसत नाही

सुमेध वाघमारे

नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजना एकत्रित राबवून अल्प उत्पन्न असलेल्या गरीब कुटुंबातील सदस्यांना ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्यविम्याचे संरक्षण देण्याची हमी दिली जात असली, तरी प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत याचा लाभ पोहोचत नसल्याचे वास्तव आहे. हृदयाचे झडप (व्हाॅल्व्ह) खराब झालेल्या ज्या रुग्णांना कृत्रिम ‘टिश्यू व्हाॅल्व्ह’ रिप्लेसमेंटची गरज असते त्याची किंमतच योजनेत समाविष्ट किमतीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे नागपूरसह अनेक ठिकाणी ही शस्त्रक्रिया ठप्प पडली आहे. यामुळे शेकडो रुग्ण उपचाराविना हृदयाच्या खराब व्हाॅल्व्हसह मृत्यूच्या दाढेत जगत आहेत.

आपल्या देशामध्ये हृदयातील झडप खराब होण्याचे प्रमाण मोठे आहे. यामागे ‘हुमॅटिक फिवर’, ‘अँटिबायोटिक्स’चा अतिवापर, हृदयविकाराचा झटका, हृदयाच्या आतील आवरणाला जंतूसंसर्ग, साठ व त्यावरील वय आदी कारणे आहेत. काहीवेळा जन्मत:च झडपांमध्ये दोष असू शकतो. मानवी हृदयामध्ये ‘मायट्रल’, ‘ट्रायकस्पिड’, ‘पल्मोनरी’ आणि ‘ऑर्टिक’ नावाच्या चार झडपा असतात. हृदयाच्या उजव्या कप्प्यामध्ये व डाव्या कप्प्यामध्ये प्रत्येकी दोन झडपा आहेत. सर्वसाधारणपणे या फुलाच्या पाकळ्यांप्रमाणे अगदी कोमल असतात. या झडपांचे कार्य हृदयातील रक्ताचा प्रवाह एकाच दिशेने मार्गस्थ करणे असते. हृदयातील रक्तप्रवाह उलट दिशेने होण्यास त्या प्रतिबंध करतात. झडप खराब झाल्यास ‘व्हाॅल्व्ह रिप्लेसमेंट’ हाच पर्याय असतो.

- योजनेत १ लाख ४० हजार रुपयेच मंजूर

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत २०२०पासून ‘व्हाॅल्व्ह रिप्लेसमेंट’ या उपचार पद्धतीचा समावेश करण्यात आला. धातू म्हणजे ‘मेटॅलिट व्हाॅल्व्ह’ला १ लाख २० हजार रुपये तर प्राण्यांपासून तयार करण्यात आलेल्या ‘टिश्यू व्हाॅल्व्ह’ला १ लाख ४० हजार रुपयांचा खर्च मंजूर आहे. परंतु, ‘टिश्यू व्हाॅल्व्ह’ची किंमतच १ लाख ६० हजारांपासून सुरू होते. शिवाय, शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य व औषधांचा खर्च ५० हजारांवर जातो. यामुळे नागपुरातील शासकीयसह खासगी रुग्णालये या योजनेतून ही शस्त्रक्रिया करत नसल्याचे वास्तव आहे.

- या रुग्णांना गरज पडते ‘टिश्यू व्हाॅल्व्ह’ची

‘मेटॅलिट व्हॉल्व्ह’ बसविल्यास रुग्णाला रोज रक्त पातळ होण्याची गोळी घ्यावी लागते. यासह इतरही कारणांमुळे ६० वर्षांवरील वय, हृदयविकारासह इतरही गंभीर आजार असलेल्या रुग्णांमध्ये हा व्हाॅल्व्ह बसविणे धोकादायक ठरते. त्यांना ‘टिश्यू व्हाॅल्व्ह’ बसविण्याचा पर्याय सुचवितात.

- शेकडो रुग्ण मृत्यूच्या दाढेत

जनआरोग्य योजनेतील लाभार्थी असलेल्या ६१ वर्षीय मायाचे हृदयाचे झडप खराब झाले आहे. मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयशल्यचिकित्सा विभागातील डॉक्टरांनी त्यांना तातडीने झडप बदलण्याचा सल्ला दिला. सोबतच ‘टिश्यू व्हाॅल्व्ह’चा खर्च जनआरोग्य योजनेत बसत नसल्याचेही सांगितले. यामुळे मागील चार महिन्यांपासून त्या मृत्यूच्या छायेखाली जगत आहेत. मायासारखे असे शेकडो रुग्ण आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर