शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

देशाला वाचवायले असेल तर भाजपाला हरवावे लागेल, योगेंद्र यादव यांचे आवाहन

By मंगेश व्यवहारे | Updated: October 3, 2023 17:11 IST

२०२४ मध्ये इंडिया आघाडीच पर्याय

नागपूर : २०२४ ची निवडणूक ही सामन्य निवडणूक नाही. लोकशाही, संविधानाला संपविणाऱ्या आणि गणतंत्राचे तुकडे करणाऱ्या भाजप व आरएसएस विरोधातील महत्वाचा लढा आहे. २०२४ च्या निवडणुका हातातून गेल्यास पुढचे २५ वर्ष पर्याय राहणार नाही. भाजप आणि आरएसएसच्या जबड्यातून देशाला वाचवायचे असेल तर भाजपाला हरवावे लागेल, असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. योगेंद्र यादव यांनी केले.

लोकशाही आणि संविधान बचाव आंदोलन मंच, आम्ही सारे भारतीय आणि धनवटे नॅशनल कॉलेज मास कम्युनिकेश विभागातर्फे मंगळवारी धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात ‘लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करणे प्रत्येक भारतीयांची जबाबदारी’ या विषयांवर आयोजित जाहीर व्याख्यानात योगेंद्र यादव बोलत होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय पक्षाच्या इंडिया आघाडीत कितीही वाद असले तरी, तोच एकमेव पर्याय असल्याचे ते म्हणाले.

२०१४ मध्ये सत्तेत आलेल्या भाजप सरकारने लोकशाहीचीच हत्या, संविधानातील समाजवाद, धर्मनिरेपक्षाता, सामाजिक न्याय, एकात्मता संविण्याचे आणि गणतंत्रला तोडण्याचे काम केले आहे. चीन व पाकिस्तानपासून जेवढा धोका या देशाला नाही, तेवढा धोका भाजप व आरएसएसपासून असल्याचे ते म्हणाले. भारत मातेच्या दोन पुत्रांमध्ये दंगे पसरविण्याचे काम आरएसएस करीत आहे. मनिपूरमध्ये सरकारने सिव्हील वार सुरू केला आहे. त्यामुळे लोकतांत्रिक पद्धतीने या सरकारला हटविणे गरजेचे आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत नागपूरकरांनो माणूस बघू नका, देशातील भाजपच्या सत्तेला आणि आरएसएस विचाराला पळविण्यासाठी इंडिया आघाडीच्या पाठीशी रहा, असे आवाहन त्यांनी केले.

या व्याख्यानाला अध्यक्ष म्हणून धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य ओ.एस. देशमुख, यांच्यासह अशोक सरस्वती, अरुण गाडे, प्रा. जावेद पाशा, अरुण लाटकर, अरुण वनकर, श्याम पांढरीपांडे, जम्मू आनंद, सुरेश अग्रवाल, देविदास घोडेस्वार, जगजितसिंग आदी उपस्थित होते.

- नागपूरला देश तोडणाऱ्या विचाराचा प्रतिकार करणारे म्हणून ओळखले पाहिजे

सद्या नागपूरातून एक विचार देशात पसरतोय. पण हा विचार देश तोडणारा आहे. हा विचार नागपूरची ओळख बनू देवू नका, नागपूर तर बहूजन आंदोलनाची भूमी आहे. नवीन उर्जा देणारी, क्रांतीची भूमी आहे. त्यामुळे नागपूरची ओळख देश तोडणाऱ्या विचाराचा प्रतिकार म्हणून झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवBJPभाजपाnagpurनागपूर