शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

भांडणे होत असतील तर कॅबीनेट घेऊ नका; विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका

By कमलेश वानखेडे | Published: September 06, 2024 5:05 PM

Nagpur : "महाराष्ट्रातील निकालानंतर केंद्रातील सरकार २०२५ हे वर्ष काढू शकणार नाही, २०२६ ला निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ येईल"

कमलेश वानखेडे, नागपूर नागपूर : महायुती सरकारच्या मंत्रीमंडळात आता भांडणे होऊ लागली आहेत. या भांडणांचा आवाज आता बाहेरही येऊ लागला आहे. असे असेल तर त्यांनी आता कॅबीनेट घेऊ नये, नाहीतर एकमेकांचे कपडे फाडतील, एकमेकांना ठोकतील, असा खोचक सल्ला विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, अलीकडील घटना पाहता कायदा सुव्यवस्थेचे धिंढवडे निघाले आहेत. गुन्हेगाराची हिंमत वाढली आहे. राजकारणासाठी जीवन उद्धवस्त होत आहे. बदलापूरातील गोळीबार घटना त्याच प्रतीक आहे. बार्टी, आर्टीचे विदर्भात ट्रेनिंग सेंटर नाही. विदर्भातील मुलाना पुणे येथे जावे लागेल. याचे प्रशिक्षण केंद्र नागपुरात उघडले गेले पाहिजे. ही मागणी करणारे पत्र आपण सरकारला देऊ. गरज पडल्यास मी आंदोलन करणार, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत आहे का, अशी विचारणा केली असता ते म्हणाले, संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा आहे. महाविकास आघाडीत उत्तम समन्वय आहे. कमिशनखोर सरकारला घालविण्यासाठी आम्ही एकसंघ आहोत. महाराष्ट्रातील निकालानंतर केंद्रातील सरकार २०२५ हे वर्ष काढू शकणार नाही, २०२६ ला निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ येईल, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :nagpurनागपूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार