शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

भूदानातील बेकायदेशीर जमीन हस्तांतरण गोत्यात

By admin | Published: March 26, 2016 2:37 AM

राज्यातील विविध भागात भूदान व ग्रामदान अधिनियमांतर्गत जमिनीच्या वापराची सद्यस्थिती व बेकायदेशीर ....

हस्तांतरणाची होणार चौकशी : नागपूर, वर्धा, यवतमाळमध्ये गडबडजितेंद्र ढवळे नागपूरराज्यातील विविध भागात भूदान व ग्रामदान अधिनियमांतर्गत जमिनीच्या वापराची सद्यस्थिती व बेकायदेशीर हस्तांतरणाचा सखोल अध्ययन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेत सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.आचार्य विनोबा भावेंच्या अभिनव प्रयोगात घोटाळा झाल्याचे सरकारी यंत्रणांनी आजवर कबूल केले आहे. मात्र हा घोटाळा कोणत्या जिल्ह्यात, कसा झाला, याबाबत आतापर्यंत कोणत्याही सरकारी यंत्रणेने सखोल अध्ययन केले नाही. विदर्भात वर्धा, यवतमाळ जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर भूदान जमिनी हस्तांतरणात गडबड करणाऱ्यांना नोटीस बजावल्या होत्या. नागपूर जिल्ह्यात नरखेड तालुक्यात बेकायदा हस्तांतरणाची प्रकरणे उजेडात आली होती. आचार्य विनोबा भावे यांनी १९५१ मध्ये आंध्र प्रदेशातून या अभिनव चळवळीला सुरु वात केली होती. भूमिहीनांना जमीन उपलब्ध करून देण्यासाठी या भूदानाचा उपयोग करण्यात आला होता. जगातील या ऐतिहासिक व अभिनव प्रयोगाला आता १८ एप्रिल २०१६ रोजी ६५ वर्षे पूर्ण होतील. भूदानासाठी विनोबांनी संपूर्ण देशामध्ये पदयात्रा केली होती. यामध्ये लाखो एकर जागा लोकांनी विनोबांना भूदानामध्ये दिली. महाराष्ट्र व बिहार राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन मिळाली होती. एकट्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक लाख एकरपेक्षा अधिक जमीन भूदानामध्ये मिळाली आहे. या जमिनीची विल्हेवाट लावण्यात सरकारला अपयश आले. ही जमीन भूमिहीनांनामिळाली नाही. ही जमीन अजूनही मूळ मालकच कसत असल्याचे काही ठिकाणी निदशर््ानास आले आहे. प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेली समिती भूदान व ग्रामदान अधिनियमाअंतर्गत जमिनीच्या संदर्भात सरकारची भविष्यातील भूमिका ठरविण्यासाठी भूदान हस्तांतरणाचा सर्वंकष अभ्यास करून यासंदर्भातील अहवाल तीन महिन्यात सरकाराला सादर करेल. कोण असेल समितीतमहसूल विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेतील समितीत वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी नामनिर्देशित केलेला वित्त विभागाचे प्रधान सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, नागपूर, पुणे आणि नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त या समितीचे सदस्य असतील. महसूल व वन विभागाचे उपसचिव या समितीचे सदस्य सचिव असतील. सरकारने भूदान व ग्रामदान अधिनियमांतर्गत जमिनींच्या वापराच्या सद्यस्थितीचा अभ्यास करून अशा जमिनींचे झालेले बेकायदेशीर हस्तांतरण व वापरात बदल यावर उपाययोजना सुचविण्यासाठी समिती स्थापन केल्याचे माहिती नाही. मात्र अशा प्रकारची समिती स्थापन करताना सरकारने भूदान यज्ञ मंडळाला विश्वासात घेणे आवश्यक होते. आचार्य हरिभाऊ वेरूळकर,अध्यक्ष, भूदान यज्ञ मंडळ