शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

सुधारित एलबीटी नियमांना धक्का नाही

By admin | Published: January 09, 2016 3:30 AM

मुंबइ उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुधारित स्थानिक संस्था कर (एलबीटी ) नियमांविरुद्ध दाखल दोन रिट याचिका तक्रारीत काहीच गुणवत्ता नसल्याचा निष्कर्ष नोंदवून फेटाळून लावल्या आहेत.

हायकोर्टाने फेटाळल्या याचिका : तक्रारीत गुणवत्ता नसल्याचा निष्कर्षनागपूर : मुंबइ उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुधारित स्थानिक संस्था कर (एलबीटी ) नियमांविरुद्ध दाखल दोन रिट याचिका तक्रारीत काहीच गुणवत्ता नसल्याचा निष्कर्ष नोंदवून फेटाळून लावल्या आहेत. यामुळे सुधारित नियम जैसे थे लागू राहणार असून त्यांना कोणत्याही स्वरूपाचा धक्का पोहोचलेला नाही.न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांनी शुक्रवारी हा निर्णय घोषित केला. विदर्भ डिस्टिलर्स व नागपूर डिस्टिलर्स यांनी सुधारित नियमांच्या वैधतेला आव्हान दिले होते. १७ डिसेंबर २०१५ रोजी दोन्ही याचिकांवर अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. सुधारित नियमांमुळे याचिकाकर्ते कोणत्याही प्रकारे प्रभावित होत नाहीत. सुधारित नियम लागू होण्यापूर्वी त्यांना बाजू मांडण्याची संधी मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शासनास निवेदन सादर केले होते. यासह विविध मुद्दे लक्षात घेता याचिकाकर्त्यांच्या तक्रारी गुणवत्तारहीत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने आदेशात नोंदविले आहे.राज्य शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका (स्थानिक संस्था कर) नियम-२०१० मधील नियम ३ व नियम १७ मध्ये दुरुस्ती केली आहे. यासंदर्भात १ आॅगस्ट २०१५ रोजी अधिसूचना काढण्यात आली आहे. सुधारित नियम १ आॅगस्ट २०१५ पासून लागू झाले आहेत. या नियमानुसार ५० कोटी व त्यापेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांनाच स्थानिक संस्था कर लागू होणार आहे. सुधारित नियम ३ मधील उपनियम १ अनुसार १ आॅगस्ट २०१५ नंतर वार्षिक ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खरेदी-विक्रीची उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना ‘एलबीटी’साठी नोंदणी करावी लागेल. तसेच सुधारित नियम १७ मधील उपनियम-१ च्या खंड-ख अनुसार १ आॅगस्ट २०१५ पूर्वी खरेदी-विक्रीची वार्षिक उलाढाल ५० कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या नोंदणीकृत व्यावसायिकांचे नोंदणी प्रमाणपत्र १ आॅगस्टपासून आपोआप रद्द झाल्याचे समजण्यात येईल. नवीन नियमाला महाराष्ट्र महानगरपालिका (स्थानिक संस्था कर) सुधारित नियम-२०१५ असे नाव देण्यात आले आहे. याविरुद्ध याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर तर, मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)