शहरं
Join us  
Trending Stories
1
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
2
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
3
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
4
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
5
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
6
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
7
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
8
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
9
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
10
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
11
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
12
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
13
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
14
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
15
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
16
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
17
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
18
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
19
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
20
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

धुक्यामुळे रेल्वे प्रवाशांची होतेय गैरसोय

By admin | Published: January 09, 2015 12:46 AM

दाट धुके पडल्यामुळे दिल्ली आणि इतर मार्गावरील विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक अद्यापही सुरळीत झालेली नाही. दरम्यान गुरुवारी आठ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत

रेल्वेगाड्या ‘लेट’ : लोकोपायलटला सिग्नल दिसण्यात अडसरनागपूर : दाट धुके पडल्यामुळे दिल्ली आणि इतर मार्गावरील विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक अद्यापही सुरळीत झालेली नाही. दरम्यान गुरुवारी आठ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊन त्यांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसण्याची पाळी आली.हिवाळ्यात दाट धुके पडत असल्यामुळे रेल्वेगाड्यांच्या लोकोपायलटला समोरील सिग्नल दिसत नाही. सिग्नल दिसत नसल्यामुळे अशा परिस्थितीत रेल्वेगाड्या चालविल्यास अपघाताची शक्यता निर्माण होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने धुके असलेल्या काळात रेल्वेगाड्या न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान गुरुवारी आठ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने धावत होत्या. उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यात १२४१० हजरत निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस ८.३० तास, १२६१६ नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस ५.२० तास, १२६२२ नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस ४ तास, १२७२३ हैदराबाद-नवी दिल्ली एपी एक्स्प्रेस १० तास, १२७२२ नवी दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस ३.३० तास, १२२९६ पटना-बेंगळुरु ६ तास, १२६७० छापरा-चेन्नई गंगाकावेरी एक्स्प्रेस ४ तास आणि १२६५० हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्कक्रांती एक्स्प्रेस २ तास उशिराने धावत आहे. दरम्यान उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यांना ताटकळत रेल्वेगाड्यांची वाट पाहत बसण्याची पाळी आली आहे. यामुळे रेल्वेस्थानकावरील वेटिंग रुममध्येही प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)