शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
4
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
6
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
7
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
8
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
9
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
10
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
11
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
12
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
13
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
14
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
15
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
16
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
18
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
19
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
20
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!

'वसुलीभाईं'च्या तटस्थ भूमिकेमुळेही गुन्हेगारीत वाढ; शस्त्र घेऊन बिनधास्त फिरतात गुन्हेगार

By नरेश डोंगरे | Updated: January 9, 2023 22:53 IST

नरेश डोंगरे ! नागपूर : सावज टिपण्यासाठी चाैकाचाैकात आडोशाला उभे राहून 'वसुलीभाईं'ची भूमीका वठविणारे वाहतूक शाखेचे पोलीसही उपराजधानीतील गुन्हेगारी ...

नरेश डोंगरे !नागपूर : सावज टिपण्यासाठी चाैकाचाैकात आडोशाला उभे राहून 'वसुलीभाईं'ची भूमीका वठविणारे वाहतूक शाखेचे पोलीसही उपराजधानीतील गुन्हेगारी वाढविण्यासाठी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा खुद्द पोलीस दलातच केली जात आहे. गुन्हेगार शस्त्र घेऊन बिनधास्त शहरातून फिरत असताना वाहतूक पोलीस मात्र तटस्थ भूमिकेत राहतात. त्यांनी दुचाकीचालकांचे लायसन्स तपासण्यासोबतच संशयितांची झडती घेतल्यास हत्या, हत्येचे प्रयत्न, यासारखे अनेक गंभीर गुन्हे टळू शकतात, असा सूरही आता उमटू लागला आहे.

शहरातील शिर्षस्थ पोलीस अधिकाऱ्यांकडून 'क्राईम कंट्रोल'साठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. मात्र, नेत्यांनी 'क्राईम कॅपिटल'चा ठपका ठेवलेल्या नागपूर शहरातील गुन्हेगारी थांबायला तयार नाही. ती वारंवार उफाळून येत आहे. विधानसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने सरकार नागपुरात आले असताना वाडीत दोघांची हत्या करून गुन्हेगारांनी राज्यकर्त्यांना हिंसक सलामी दिली. त्यानंतर सरकार असेपर्यंत कोतुलवारची हत्या अन् हत्येच्या प्रयत्नाच्या घटना घडतच राहिल्या. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाचपावलीत राजेश विनोद मेश्राम नामक तरुणाची हत्या झाली. दोन दिवसांपूर्वी कळमन्यात झालेल्या हत्येच्या घटनेची शाई वाळत नाही तोच आता पुन्हा कुख्यात घनचक्करने अविनाश जुमडे नामक गुन्हेगाराची हत्या केली. हत्येच्या या घटना सर्वसामान्यांच्या काळजात धडकी भरविणाऱ्या आहेत.

गुन्हेगारी नियंत्रणाचा दावा केला जात असला तरी गुन्हेगार मात्र अनियंत्रित असल्याचे वास्तव यातून उघड होत आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, गुन्हेगार बिनधास्त रस्त्याने घातक शस्त्रे घेऊन फिरत असताना पोलिसांना ते का दिसत नाही, असाही प्रश्न चर्चेला आला आहे. या प्रश्नामुळे गस्तीवर असणाऱ्या तसेच चाैकाचाैकात उभे राहणाऱ्या पोलिसांच्या कर्तव्यावर, सतर्कतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शहरातील कोणत्याही वर्दळीच्या भागात फिरल्यास टपोरी टाईपचे तरुण बिनधोक ट्रिपल सिट फिरताना दिसतात. चाैकाचाैकात सिग्नल तोडणाऱ्या सावजाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या वाहतूक पोलिसांनी कर्तव्यनिष्ठता दाखवून त्यांची झाडाझडती घेतल्यास शहरात रोज अनेक शस्त्रधारी गुन्हेगारांची मानगुट पकडण्यास मदत होऊ शकते. मात्र, गुन्हेगारांना पकडण्याची आपली जबाबदारी नाही, असा वाहतूक पोलिसांचा अविर्भाव असतो. त्यामुळे शस्त्र घेऊन फिरणारे गुन्हेगार गाडीचा कट लागल्यामुळे किंवा रागाने पाहिल्याचे क्षुल्लक कारणावरून भर रस्त्यावर निर्दोष व्यक्तीची हत्या करताना दिसत आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांचा हा जीवघेणा तटस्थपणा आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीतही चर्चेला आला होता, हे विशेष !

ईन्स्टाग्रामवर चाकू अपलोड -कळमन्यातील हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीने दोन महिन्यापूर्वी त्याच्या ईन्स्टाग्राम अकाउंटवर चाकूचा फोटो अपलोड केला होता, अशी माहिती पुढे आली आहे. शहरातील कोणत्याच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याला गुन्हा घडण्यापूर्वी हे दिसले नाही, ही दुसरी एक धक्कादायक बाब ठरावी. 

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस