शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

लाचखोरांच्या शिक्षेचे वाढले प्रमाण

By admin | Published: November 14, 2014 12:52 AM

लाच सापळ्यांच्या वाढीबरोबरच राज्यात लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाणही वाढले आहे. राज्यात चालूवर्षी शिक्षा होण्याचे प्रमाण ३२ आणि नागपुरात २४ टक्के आहे. ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक

राहुल अवसरे - नागपूरलाच सापळ्यांच्या वाढीबरोबरच राज्यात लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाणही वाढले आहे. राज्यात चालूवर्षी शिक्षा होण्याचे प्रमाण ३२ आणि नागपुरात २४ टक्के आहे. ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार चालू वर्षी आतापर्यंत १९२ प्रकरणांपैकी ६१ प्रकरणांमध्ये शिक्षा झाली असून १३१ प्रकरणे निर्दोष ठरली आहेत. शिक्षा होण्याची टक्केवारी ३२ एवढी आहे.२०१३ मध्ये एकूण ३८७ प्रकरणांपैकी ८० मध्ये शिक्षा आणि ३०७ प्रकरणांमध्ये आरोपी निर्दोष सुटल होते. ही टक्केवारी २१ होती. शिक्षेच्या टक्केवारीत ११ ने वाढ झाली आहे. २०१२ मध्ये ४९४ प्रकरणांपैकी ३७६ मध्ये निर्दोष आणि ११८ प्रकरणांमध्ये शिक्षा झाली होती. ही टक्केवारी २४ होती. २०११ मध्ये एकूण ३८३ प्रकरणांपैकी ९० मध्ये शिक्षा तर २९३ प्रकरणे निर्दोष सुटली होती. ही टक्केवारी २३ होती. २०१० मध्ये ३५३ प्रकरणांपैकी ६८ मध्ये शिक्षा तर २८५ प्रकरणे निर्दोष सुटली होती. ही टक्केवारी १९ होती. २००९ मध्ये एकूण ४६६ प्रकरणांपैकी १०६ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली होती. तर ३६० प्रकरणातील आरोपी निर्दोष ठरले होते. शिक्षेची टक्केवारी २३ होती. नांदेडमध्ये शिक्षेचे प्रमाण सर्वाधिकलाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाण नांदेड परिक्षेत्रात सर्वाधिक आहे. चालूवर्षी एकूण ८ प्रकरणांपैकी ४ प्रकरणात शिक्षा आणि ४ प्रकरणे निर्दोष सुटली आहेत. शिक्षेची टक्केवारी ५० आहे. २०१३ मध्ये २२ पैकी ५ मध्ये शिक्षा आणि १७ प्रकरणे निर्दोष सुटली होती. ही टक्केवारी २३ होती. २०१२ मध्ये ३३ पैकी ९ मध्ये शिक्षा आणि २४ प्रकरणे निर्दोष ठरली होती. शिक्षेची टक्केवारी २७ होती. २०११ मध्ये २२ प्रकरणांपैकी ३ मध्ये शिक्षा आणि १९ प्रकरणे निर्दोष सुटली होती. ही टक्केवारी १४ होती. २०१० मध्ये १९ पैकी १४ प्रकरणे निर्दोष तर ५ मध्ये शिक्षा झाली होती. ही टक्केवारी २६ होती. २००९ मध्ये ३४ प्रकरणांपैकी ७ मध्ये शिक्षा आणि २७ प्रकरणे निर्दोष सुटली होती. ही टक्केवारी २१ होती. अमरावतीमध्ये शिक्षेचे प्रमाण १४ टक्केअमरावती परिक्षेत्रात लाचखोरांच्या शिक्षेचे प्रमाण सर्वात कमी १४ टक्के आहे. चालू वर्षी २१ प्रकरणांपैकी ३ मध्ये शिक्षा तर १८ मध्ये आरोपी निर्दोष सुटले. २०१३ मध्ये ४६ पैकी १५ मध्ये शिक्षा तर ३१ प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटले. शिक्षेची टक्केवारी ३३ होती. २०१२ मध्ये ६२ पैकी १७ मध्ये शिक्षा तर ४५ प्रकरणे निर्दोष होती. शिक्षेची टक्केवारी २७ होती. २०११ मध्ये ३७ पैकी ६ मध्ये शिक्षा आणि ३१ प्रकरणे निर्दोष ठरली. शिक्षेची टक्केवारी १६ होती. २०१० मध्ये ३४ पैकी ६ मध्ये शिक्षा आणि २८ प्रकरणे निर्दोष ठरली होती. ही टक्केवारी १८ होती. २००९ मध्ये ३३ पैकी ७ मध्ये शिक्षा आणि २६ प्रकरणात आरोपी निर्दोष सुटले होते. ही टक्केवारी २१ होती. नागपुरात शिक्षेच्या प्रमाणात सुधारणानागपुरात शिक्षा होण्याच्या प्रमाणात सुधारणा होत आहे. चालू वर्षी शिक्षेचे प्रमाण २४ टक्के आहे. एकूण ३८ प्रकरणांपैकी आरोपींना ९ मध्ये शिक्षा तर २९ प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटले आहेत. २०१३ मध्ये ३५ पैकी ७ मध्ये शिक्षा तर २८ प्रकरणे निर्दोष होती. ही टक्केवारी २० होती. २०१२ मध्ये ३९ पैकी ३२ प्रकरणांमध्ये आरोपी निर्दोष होते तर ७ मध्ये शिक्षा झाली होती. शिक्षेचे प्रमाण १८ टक्के होते. २०११ मध्ये ४८ पैकी १३ मध्ये शिक्षा तर ३५ प्रकरणे निर्दोष होती. टक्केवारी २७ होती. २०१० मध्ये ३८ पैकी ६ प्रकरणात शिक्षा तर ३२ प्रकरणातील आरोपी निर्दोष ठरले होते. शिक्षेचे प्रमाण १६ टक्के होते. २००९ मध्ये ८९ पैकी २५ मध्ये शिक्षा तर ६४ प्रकरणातील आरोपी निर्दोष होते. ही टक्केवारी २८ होती.