शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
3
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
4
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
5
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
6
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
7
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
8
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
9
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
10
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
11
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
12
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
13
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
14
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
15
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
16
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
17
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
18
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
19
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
20
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत

तापमानवाढीस कारणीभूत देशांमध्ये भारत पाचवा; हरितवायूचे उत्सर्जन नियंत्रणाबाहेर

By निशांत वानखेडे | Published: April 02, 2023 8:00 AM

Nagpur News जगाच्या एकूण तापमानवाढीत भारताने ०.०८ अंश सेल्सिअसची भर घातली असून, तापमानवाढीस कारणीभूत ठरलेल्या जगातील १० देशांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे. एकूण प्रमाणात हे याेगदान ४.८ टक्के आहे.

निशांत वानखेडे

नागपूर : जागतिक तापमानवाढ ही जगासाठी नाही तर आपल्या ग्रहासाठीच समस्या ठरली आहे. ही समस्या निर्माण करणाऱ्या देशांमध्ये भारताचेही याेगदान आहे. जगाच्या एकूण तापमानवाढीत भारताने ०.०८ अंश सेल्सिअसची भर घातली असून, तापमानवाढीस कारणीभूत ठरलेल्या जगातील १० देशांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे. एकूण प्रमाणात हे याेगदान ४.८ टक्के आहे.

युरोप आणि युनायटेड स्टेट्समधील संशोधकांनी १८५० पासून कार्बन डायऑक्साइड (CO2), मिथेन (CH4) आणि नायट्रस ऑक्साइड (N2O) सारख्या हरितगृह वायूंमुळे झालेले जागतिक तापमानवाढीसाठी राष्ट्रीय योगदानाची गणना केली. १८५१ ते २०२१ पर्यंत भारतातील कार्बन, मिथेन व नायट्रस ऑक्साइड या वायूंच्या उत्सर्जनामुळे अनुक्रमे ०.०४ अंश सेल्सिअस, ०.०३ अंश सेल्सिअस आणि ०.००६ अंश सेल्सिअस जागतिक तापमान वाढ झाली आहे. या याेगदानासह टाॅप १० देशांत भारत पाचव्या क्रमांकावर असल्याचे वैज्ञानिक डाटामध्ये प्रकाशित संशाेधनात आढळून आले आहे. हा डेटासेट हवामान धोरण आणि बेंचमार्किंगची माहिती देण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

- अभ्यासाच्या विश्लेषणानुसार मिथेन ०.४१ अंश सेल्सिअस व एन२ओ ०.०८ अंश सेल्सिअसच्या तुलनेत कार्बन डायऑक्साइड १.११ अंश सेल्सिअस तापमानवाढीसाठी जबाबदार आहे.

- यादीत यूएसए पहिल्या क्रमांकावर. एकूण तापमानवाढीत यूएसएचे याेगदान ०.२८ अंश सेल्सिअस म्हणजे १७.३ टक्के आहे.

- रशियाला मागे टाकून चीन दुसऱ्या क्रमांकावर. याेगदान ०.२० अंश सेल्सिअस. (१२.३ टक्के)

- रशिया तिसऱ्या क्रमांकावर. ०.१० डिग्री सेल्सिअस. प्रमाण ६.१ टक्के.

- ब्राझील चाैथ्या क्रमांकावर, याेगदान ०.०८ डिग्री सेल्सिअस व प्रमाण ४.९ टक्के

- भारत २००५ पूर्वी १० व्या क्रमांकावर हाेता, पण त्यानंतर झेप घेत ५ व्या क्रमांकावर आला.

- इंडोनेशिया, जर्मनी, युनायटेड किंगडम, जपान आणि कॅनडा यांनी प्रत्येकी ०.०३-०.०५ डिग्री सेल्सिअस तापमानवाढीचे योगदान दिले.

- औद्याेगिक क्रांतीनंतर विकसित देश जागतिक तापमानवाढीस कारणीभूत ठरले आहे.

- जीवाश्म इंधन हे सर्वाधिक कारणीभूत

कार्बन संबंधित तापमानवाढीच्या तुलनेत मिथेन आणि नायट्रस ऑक्साइडमुळे तापमानवाढीसाठी भारत, चीन आणि ब्राझीलचे योगदान अनुक्रमे ११० टक्के, ५६ टक्के आणि ५५ टक्क्यांनी वाढले आहे.

- संशाेधकांच्या मते मिथेन व नायट्रस ऑक्साइडचे उत्सर्जन अनिश्चित आहे.

- जीवाश्म इंधनातून निर्माण हाेणारे सीओटूचे उत्सर्जन हे सर्वात भयंकर आहे.

- १९९२ पासून, जागतिक जीवाश्म इंधन उत्सर्जनामुळे होणारी अतिरिक्त तापमानवाढ जमीन-वापराच्या बदलामुळे होणाऱ्या अतिरिक्त तापमानवाढीपेक्षा चारपट जास्त आहे.

टॅग्स :weatherहवामान