शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विदर्भात होणार ‘इनलॅण्ड रिफायनरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 20:00 IST

नाणारमध्ये कोस्टल आॅईल रिफायनरीला होत असलेल्या विरोधातच विदर्भात ‘इनलॅण्ड आॅईल रिफायनरी’ उभारण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवरी विधानसभेत दिले. त्यांनी सांगितले की, ते या संदर्भात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना विनंती करून ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यत पोहोचवतील.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पेट्रोलियम मंत्र्यांना करणार विनंती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाणारमध्ये कोस्टल आॅईल रिफायनरीला होत असलेल्या विरोधातच विदर्भात ‘इनलॅण्ड आॅईल रिफायनरी’ उभारण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवरी विधानसभेत दिले. त्यांनी सांगितले की, ते या संदर्भात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना विनंती करून ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यत पोहोचवतील.भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी यासंदर्भातील उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ते बोलत होते. देशमुख यांनी नाणारमध्ये कोस्टल रिफायनरीला होत असलेला विरोध पाहता ही रिफायनरी विदर्भात स्थापित करण्याची मागणी केली होती. ते म्हणाले की, ‘त्यांना माहीत आहे नाणारमध्ये प्रस्तावित रिफायनरी ही कोस्टल (समुद्र तट) आहे, आणि समुद्राला विदर्भात आणता येऊ शकत नाही. परंतु रिफयनरी मात्र निश्चित स्थापित होऊ शकते. यामुळे ५० हजार लोकांना प्रत्यक्ष व १ लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. देशाला ‘आॅईल सिक्युरिटी’ देण्यासाठी या दिशेने ही महत्त्वपूर्ण ठरेल. देशात नऊ इनलॅण्ड रिफायनरी आहे. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, नाणारची कोस्टल रिफायनरी विदर्भात आणता येऊ शकत नाही. मात्र इनलॅण्ड रिफायनरीसाठी केंद्र सरकारला विनंती केली जाईल. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी नाणारमध्ये रिफायनरी येणार की नाही, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना केला. परंतु मुख्यमंत्र्यांनी विदर्भात रिफायनरी आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगत नाणारबाबतचे उत्तर देण्याचे टाळले.देवेंद्र, धर्मेंद्र आणि नरेंद्रसभागृहात त्यावेळी सर्वांनाच हसू आले जेव्हा आशिष देशमुख यांनी ‘ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यामार्फत ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवावी’ अशी विनंती मुखयमंत्र्यांना केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत म्हटले की ‘ मी (देवेंद्र) रिफायनरी स्थापित करण्याची विनंती धर्मेंद्र प्रधान यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवेल.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस