शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

आयपीएलने मोडले बुकींचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 09:58 IST

देश-विदेशातील बुकींसाठी पर्वणी समजला जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)चे अकरावे सीझन मध्य भारतातील बुकींचे कंबरडे मोडणारे ठरले.

ठळक मुद्देअनेकांचे डाव फसलेकोट्यवधींचा फटकामध्य भारतातील बुकी बाजार गारद

नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देश-विदेशातील बुकींसाठी पर्वणी समजला जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)चे अकरावे सीझन मध्य भारतातील बुकींचे कंबरडे मोडणारे ठरले. नागपूर-विदर्भातील बहुतांश बुकींचे पहिल्यांदाच क्रिकेटच्या सामन्यात डाव उलटे पडले. परिणामी अनेकांना कोट्यवधींचे नुकसान झाल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकट्या फिक्सरला या सीझनमध्ये दीडशे कोटींचा फटका बसल्याची जोरदार चर्चा आहे. बहुतांश बुकी कोट्यवधींची रक्कम हरल्यामुळे मध्य भारतातील सट्टाबाजार गारद झाल्याची माहिती संबंधित वर्तुळातून पुढे आली आहे.आयपीएल टी-२० क्रिकेटच्या रणसंग्रामाची सांगता रविवारी २७ मे रोजी झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आणि खासकरून आयपीएलचे सीझन म्हणजे देश-विदेशातील बुकींसाठी पर्वणी समजले जाते. रोज कोट्यवधींची उलाढाल अन् लाखोंची कमाई होत असल्याने बुकी मंडळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांची खास तयारी करून ठेवतात. जागोजागी हायटेक अड्डे तयार करून क्रिकेट बेटिंगची व्यवस्था करतात. ठिकठिकाणच्या पंटर्सना लाईन देतात.विशेष म्हणजे, नागपूरचे बुकी देश-विदेशात चर्चेला आहेत. कारण चार वर्षांपूर्वी दिल्ली पोलिसांनी उघड केलेल्या मॅच फिक्सिंगमध्ये श्रीशांत, विंदू दारासिंगसह नागपुरातील सुनील भाटिया, छोटू अग्रवाल, मुन्ना डोले या बुकींसह अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. त्यामुळे येथील बुकी आणि सट्टाबाजाराच्या धक्कादायक नेटवर्कचा खुलासा झाला होता. तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची मॅच फिक्स करणाऱ्यांमध्ये नागपूरचे बुकी असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली होती. त्यानंतर उपराजधानीतील सट्टाबाजार देश-विदेशातील बुकींचे ‘हॉट मार्केट’ असल्याचे आणि येथील बुकी केवळ नागपूर-विदर्भच नव्हे तर मध्य भारतातील क्रिकेटचा सट्टाबाजार संचालित करीत असल्याचे उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर, आयपीएलच्या अकराव्या क्रिकेट संग्रामाची तयारी झाली होती. स्थानिक बुकींनी विविध ठिकाणी लाईन देऊन ठेवली होती. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी यावर्षी नागपूरात नव्हे तर भंडाऱ्यात कंट्रोल रूम उघडली होती. तेथून ते मध्य भारतातील क्रिकेट सट्ट्याचा कारभार संचालित करीत होते. दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, इंदूर, भोपाळ, रायपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धासह थेट गोवा, दुबई आणि बँकॉकमध्ये बसलेल्या बुकींच्याही स्थानिक बुकी निरंतर संपर्कात होते.पहिल्या सामन्याच्या नाणेफेकीपासून नंतरच्या प्रत्येक घडामोडीवर बुकींनी खयवाडी लगवाडी केली होती. पहिल्या २० सामन्यांपर्यंतची स्थिती स्थानिक बुकींसाठी ठिकठाक होती. नंतर मात्र बुकींची अवस्था पिटल्यासारखीच झाली. संबंधित वर्तुळाच्या माहितीनुसार, ६० पैकी ४५ सामन्यांमध्ये डाव उलटे पडल्याने बहुतांश बुकी गारद झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, एकट्या रिंकूला दीडशे कोटींचा फटका बसला. राज, सोनू कामठीचेही कंबरडे मोडले. रम्यासह भंडारा, वर्धा, यवतमाळ, गोंदिया आणि ठिकठिकाणी अड्डे संचालित करणाऱ्या बुकींची कोट्यवधींची हार झाल्याने दाणादाण उडाली.५० टक्के फायनलपूर्वीच आऊट४रविवारी आयपीएलची सांगता झाली. खरेतर फायनलचा सामना बुकीबाजारात सर्वाधिक उलाढालीचा सामना असतो. मात्र, कधी नव्हे एवढी मोठी रक्कम हरल्यामुळे अनेक बुकी हतबल झाले. त्यामुळे रविवारी फायनलच्या सामन्याच्या वेळी मध्यभारतातील सुमारे ५० टक्के बुकी बेटिंगसाठी बसलेच नाहीत. प्रत्यक्ष खयवाडीऐवजी इकडून तिकडे कटिंग करणाऱ्या बुकींनीच फायनलची खयवाडी केली. गेल्या दहा वर्षांत नागपूर-विदर्भातील बुकींना एवढे मोठे नुकसान कधीच सहन करावे लागले नाही, असे एका संबंधिताने लोकमतला सांगितले.

टॅग्स :IPL 2018आयपीएल 2018