शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सुराबर्डी तलावाच्या जमिनीत घोटाळा केल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 17:07 IST

Nagpur : कर्तव्य बजावण्यात अप्रामाणिकपणा दिसल्यामुळे हायकोर्टाने केली कानउघाडणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यावसायिक अंकुर अग्रवाल यांच्यासोबत हातमिळवणी करून सुराबर्डी तलावाच्या जमिनीची भरभरून मलाई खाल्ली, असा संशय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला बुधवारी मूळ अभिलेखाची पाहणी केल्यानंतर आला. त्यामुळे न्यायालयाने पाटबंधारे अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून कार्यकारी संचालकांना यावर ११ डिसेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला.

तब्बल ७५.३९ हेक्टर परिसरात पसरलेल्या आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांची पाण्याची गरज भागवित असलेल्या सुराबर्डी तलावाच्या संवर्धनासाठी शेतकरी नितीन शेंद्रे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गेल्या तारखेला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रांजली टोंगसे यांच्या प्रतिज्ञापत्राचे अवलोकन केल्यानंतर न्यायालयाला विविध मुद्दे खटकले होते. पाटबंधारे विभागाने पर्यटन विकासाकरिता सुराबर्डी तलावाची काही जमीन अंकुर अग्रवाल यांना २००५ मध्ये दहा वर्षांच्या लीजवर दिली होती. ती लीज मार्च २०१५ मध्ये संपली. परंतु, महामंडळाने ती जमीन अद्याप स्वतःच्या ताब्यात घेतली नाही. त्यामुळे न्यायालयाने कार्यकारी संचालकांना यासंदर्भात प्रतिज्ञापत्र मागितले होते. 

तसेच, पाटबंधारे अधिकारी खरी माहिती लपवून ठेवत असल्याचे दिसून आल्याने जमिनीच्या लीजचा मूळ अभिलेखही सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, कार्यकारी संचालकांनी बुधवारी प्रतिज्ञापत्र सादर केले, पण त्यातील माहितीने न्यायालयाचे समाधान झाले नाही. हे प्रतिज्ञापत्र कार्यकारी संचालकांची बेजबाबदार वृत्ती दर्शविते, असे न्यायालयाने खडसावले. त्यानंतर लीज कराराचा मूळ अभिलेख तपासल्यानंतर अग्रवाल या सार्वजनिक जमिनीचा सुरुवातीपासूनच खासगी उपयोग करीत असल्याचे आणि त्यांनी या ठिकाणी पर्यटन विकासाकरिता कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याचे आढळून आले. करिता, न्यायालयाने अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. सुधीर मालोदे, तर पाटबंधारे विभागातर्फे अॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.

हायकोर्टाने असे ताशेरेही ओढले

  • सुराबडी तलावाच्या जमिनीवर नागरिकांकरिता पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. परंतु, या जमिनींचा विशेष व्यक्तीकरिता दुरुपयोग करण्यात आला. या जमिनीचे व्यावसायिक शोषण केले जात आहे. 
  • ही जमीन दीर्घकाळापासून खासगी व्यक्तीच्या ताब्यात आहे. त्या व्यक्तीचा या जमिनीवर कोणताही अधिकार नाही. 
  • ही जमीन कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याची खासगी मालमत्ता नाही. ही सार्वजनिक जमीन आहे. परंतु, अधिकारी तिचा खासगी मालमत्तेसारखा उपयोग करीत आहेत.
  • हा तलाव अतिक्रमणमुक्त ठेवण्याची व त्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी पाटबंधारे महामंडळाची आहे. परंतु, महामंडळ याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते.
टॅग्स :nagpurनागपूर