शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
4
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
5
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
6
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
7
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
8
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
9
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
11
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
12
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
13
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
14
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
15
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
16
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
17
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
18
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
19
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
20
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश

निवडणूक आयोग बूथ कॅपचरिंग करत आहे का?

By कमलेश वानखेडे | Updated: November 29, 2024 16:12 IST

नाना पटोले यांचा सवाल : ईव्हीएमवर एवढे प्रेम का ?

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतदानाच्या शेवटच्या तासात झारखंडमध्ये मते वाढली, पण ते प्रमाण फक्त दीड टक्का होते. मात्र, महाराष्ट्रमध्ये ७.६ टक्के मतदान वाढले. हे मतदान रात्री कसे वाढले, एवढी मोठी लाईन कुठे लागली, त्या लाईनचे फोटो निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणी करीत निवडणूक आयोग बूथ कॅपचरिंग करत आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, आपण निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले त्यावर उत्तर देण्याचा आयोगाने अयशस्वी प्रयत्न केला. सायंकाळी ६ नंतर ६२.२ टक्के मतदान झाल्यावर रात्री ६६.५ टक्के मतदान झाल्याचे सांगतात. ९ लाख मते कशी वाढली याचे उत्तर आयोगाने द्यावे. सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोग पारदर्शक कारभार असल्याचे सांगतात, मग ईव्हीएमचे एवढे प्रेम का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या विरोधात राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबविली जाईल. लाखो लोकांच्या स्वाक्षरीसह मुख्य निवडणूक आयोगाला पत्र दिले जाईल. आम्ही न्यायालयीन लढाई लढू, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारू, जण भावनेची लढाई लढू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

निवडणूक आयोगाच्या कृपेने आलेले सरकारमतदान वाढले त्याचा फायदा कोणाला होतो याची चर्चा होते, पण निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. आम्ही मतदान वाढवले असे आयोग ट्विट करते, पण हे मतदान कसे वाढले, याचे स्पष्टीकरण देत नाही. हे लोकांचा मतांनी नव्हे तर निवडणूक आयोगाच्या कृपेने आलेले सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

पाच दिवस होऊनही सरकार अस्तित्वात नाहीमुख्यमंत्री कोण होईल याचा निर्णय भाजप नेचे घेतील. पण निकाल लागून पाच दिवस झाले तरी सरकार अस्तित्वात आले नाही, हे चिंताजनक आहे. एकनाथ शिंदे नाराज आहेत की आणखी कुणी याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगnagpurनागपूरcongressकाँग्रेसMahayutiमहायुतीEVM Machineईव्हीएम मशीन