शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
5
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
6
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
7
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
9
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
10
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
11
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
12
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
13
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
14
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
15
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
16
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
17
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
18
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
19
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
20
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न

भारतीय मीडियाचं ध्रुवीकरण झालंय? ANIच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 23:29 IST

Smita Prakash : माध्यमांबाबत सोशल माध्यमांवर नकारात्मक प्रचार-प्रसार होतो. मात्र माध्यमांचे कुठल्याही प्रकारचे ध्रुवीकरण झालेले नाही. माध्यमे कालसुसंगत पद्धतीनेच कार्य करत आहेत, असे प्रतिपादन स्मिता प्रकाश यांनी केले.

भारतीय मीडियाचं ध्रुविकरण झालं आहे का? य मुद्यावर बोलताना लोकमत मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश म्हणाल्या की, ध्रुवीकरण चांगली बाब आहे. कारण आज सगळ्यांकडे मोबाईल आहेत. सोशल मीडिया आहे. कुणालाही कुठल्याही बाबतीत सांगण्यासाठी आमची गरज नाही. 

यावेळी मीडिया आपल्या बातम्या कव्हर करत नाही, या राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपालाही त्यांनी उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, राहुल गांधी म्हणतात की, मीडिया पक्षपाती झालाय, तो माझ्या बातम्या कव्हर करत नाही. मात्र भारत जोडो यात्रेतील एक एक दिवस भारतीय मीडियाने कव्हर केला आहे. राहुल गांधी जेव्हा प्रेस कॉन्फ्ररन्स करतात तेव्हा सर्व वृत्तवाहिन्या ती कव्हर करतात. हा मोदी समर्थक आहे. हा राहुल समर्थक आहे. हा पवार समर्थक आहे, हा ममता समर्थक आहे, असा आरोप करणं सोपं आहे. मात्र आता शिव्या खाऊन खाऊन आमची चामडी घट्ट झाली आहे, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. 

यावेळी परदेशी प्रसारमाध्यमांचा उल्लेख करत स्मिता प्रकाश यांनी सांगितलं की, भारतीय मीडिया आपलं काम करत नाही आहे, अशी वातावरणनिर्मिती परदेशी मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आम्ही बातम्या कव्हर करत नाही, तर सरकारच्या विचारांचं पालनपोषण करत आहोत, असा आरोप होतो. तीन दिवसांपूर्वी टाइम मॅगझिनमध्ये एक बातमी प्रसारित झाली होती. तिचा मुख्य  मुद्दा हा अमृतपाल याला अटक करण्याच्या मोहिमेत झालेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा होता. त्याचं कारण म्हणजे यावेळी इंटरनेट आणि मेसेजिंगवर निर्बंध आणले गेले होते. मात्र या मंडळींना पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीनसारख्या देशात होणाऱ्या अशाच प्रकारांची चिंता नसते, असा टोला त्यांनी लगावला.

माध्यमांबाबत सोशल माध्यमांवर नकारात्मक प्रचार-प्रसार होतो. मात्र माध्यमांचे कुठल्याही प्रकारचे ध्रुवीकरण झालेले नाही. माध्यमे कालसुसंगत पद्धतीनेच कार्य करत आहेत, असे प्रतिपादन स्मिता प्रकाश यांनी केले.

टॅग्स :Mediaमाध्यमेLokmatलोकमत