शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

१०० किलो वजनाचे पोते माणसाने उचलणे अमानवीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 8:15 PM

Nagpur News केंद्र सरकारच्या श्रम आणि कामगार मंत्रालयाने ठरविलेल्या मानांकनानुसार कोणत्याही बाजारपेठेत १०० किलो वजनाचे पोते माणसाने उचलणे अमानवीय असल्याचे ठरविण्यात आले आहे.

नागपूर : केंद्र सरकारच्या श्रम आणि कामगार मंत्रालयाने ठरविलेल्या मानांकनानुसार कोणत्याही बाजारपेठेत १०० किलो वजनाचे पोते माणसाने उचलणे अमानवीय असल्याचे ठरविण्यात आले आहे. कितीही ताकदवान माणसाचे वजन सरासरी १०० किलोच्या वर नसते. मग एखाद्याला त्याच्या वजनापेक्षा जास्त वजन उचलायला लावणे अमानवीय असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात कामगारांना ५० किलो वजनाच्यावर भार न देण्याच्या सूचना पणन संचालनालयाने दिल्या आहेत. जिल्ह्यात सर्वच बाजार समित्यांमध्ये गहू, तांदूळ, सोयाबीनच्या पोत्याचे वजन ५० किलो असते. अजूनही धानाचे पोते ७० किलोचेच आहे.

७० किलोचे पोतेही उचलावे लागते

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात कामगारांना ५० किलो वजनाच्यावर भार न देण्याच्या सूचना पणन संचालनालयाने दिल्या आहेत. जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पोत्याचे वजन साधारण ५० किलोचे असते. त्यात सोयाबीन, हरभरा, तूर आदींचे पोते ५० किलो तर ७० किलोचे धानाचे पाेते अजूनही उचलावे लागते.

पाठीचे हाड मोडू शकते...

पाठीच्या कण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची लवचिकता होय. सतत जास्त वजनाचे पोते पाठीवर सतत वाहून नेल्याने हळूहळू नैसर्गिक लवचिकता कमी झाल्याने स्नायू आखडतात. प्रसंगी पाठीचे हाड मोडू शकते. हाताच्या सर्व हालचाली करताना खांदे आणि पाठ स्थिर असते. सतत एकाच स्थितीत राहिल्याने मान, पाठीचा कणा स्टिफ बनतो. त्यातून मानदुखी, कंबरदुखीला सुरुवात होते. अशा वेळी पाठ मोकळी असणे गरजेचे आहे. बाजार समित्यांमध्ये हमालाने पाठीवर कमी वजन उचलणे आवश्यक आहे.

आता पोत्याचे वजन ५० किलो

पूर्वी गहू, तांदूळ आणि अन्य कृषिमालाचे १०० किलोचे पोते राहायचे. जास्त पोते वाहून नेणे त्यावेळी कठीण होते. पण जास्त मजुरी मिळत असल्यामुळे न्यावे लागायचे. पण आता बाजार समितीत सर्व मालाचे पोते ५० किलोचे असते.

- शालिक देवासे, कामगार.

आधीच्या तुलनेत आता कृषिमालाच्या पोत्याचे वजन कमी झाले आहे. गहू, तांदूळ, सोयाबीनचे पोते आता ५० किलोचे झाले आहे. वजन कमी झाल्यामुळे मजुरीही कमी झाली आहे. आताही तेवढ्याच वजनाची जास्त पोती वजनावर न्यावी लागतात.

- छबलू उके, कामगार.

टॅग्स :Labourकामगार