शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

कमकुवत विरोधी पक्षामुळेच शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:07 AM

नागपूर : देशामध्ये विरोधी पक्ष मजबूत असता तर आम्हाला शेतकऱ्यांचे आंदोलन उभारण्याची गरज पडली नसती. हे आंदोलन कमकुवत असलेल्या ...

नागपूर : देशामध्ये विरोधी पक्ष मजबूत असता तर आम्हाला शेतकऱ्यांचे आंदोलन उभारण्याची गरज पडली नसती. हे आंदोलन कमकुवत असलेल्या विरोधी पक्षामुळेच उभे राहिले. आम्ही बाहेर लढत आहोतच. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाने सभागृहात आमची बाजू मांडावी. तरच ते शेतकऱ्यांसोबत आहेत असे समजावे लागेल, असे प्रतिपादन संयुक्त किसान मोर्चाच्या कोअर कमिटीचे सदस्य राकेश टिकैत यांनी केले.

संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यासाठी सुरू असलेल्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान राकेश टिकैत नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, ते म्हणाले, आमचे आंदोलन कुण्याही पक्षाविरोधात नाही तर केंद्र सरकारने केलेले तीन बिल परत द्यावे, या एकमेव मागणीसाठी आहे. सुप्रीम कोर्टाचे आम्ही आभार मानतो. मात्र न्यायालयाने नेमलेल्या समितीतील सर्व सदस्य कायदे समर्थक आहेत. त्यामुळे आम्ही या समितीशी चर्चा वा वाटाघाटी करणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. पत्रकार परिषदेला संयुक्त किसान मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गिड्डे, राष्ट्रीय किसान महासंघाचे संयोजक श्रीकांत तराळ, शेतकरी नेते अरुण वनकर, जय जवान, जय किसान संघटनेचे प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

...

राजभवनाला ट्रॅक्टरचा घेराव घालणार

१८ जानेवारीला महिला किसान सन्मान दिवस आहे. त्याची तयारी सुरू असल्याची माहिती देऊन ते म्हणाले, २३ जानेवारीला एक हजार ट्रॅक्टरसह राजभवनला घेराव घालण्याचे नियोजन आहे. गनिमी कावा पद्धतीने होणारे हे आंदोलन कुठल्या राजभवनावर होईल, हे वेळेवर ठरवले जाईल, असे त्यांनी सांगितले. २६ जानेवारीला सुद्धा देशव्यापी आंदोलन उभारले जाईल. मात्र ते कशा स्वरूपाचे असेल, हे त्यांनी जाहीर केले नाही.

...

तर त्यांनी बाहेर पडावे

‘किसान बिल वापसी नाही, तोपर्यंत किसान वापसी नाही’, अशी भूमिका स्पष्ट करून टिकैत म्हणाले, आमच्या आंदोलनात सुमारे ५५० संघटना आहेत. यापैकी एकही संघटना माघार घेणार नाही. मे २०२४ पर्यत आंदोलन सुरू ठेवण्याची आमची तयारी आहे. इतका दीर्घकाळ धीर धरण्याची तयारी नसणाऱ्यांनी आंदोलनातून बाहेर पडले तरी चालेल. आमचे आंदोलन कोणत्याही पक्षाविरोधात नाही तर सरकार विरोधात आहे.

...

संयुक्त किसान माेर्चाचे समन्वयक चौधरी राकेश टिकैत यांची टीका

लुटारूंचे शेवटचे बादशहा कोण आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. हे बादशहा शेतकऱ्यांना लुटण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न करीत आहेत. पण, आम्ही या बादशहाचे प्रयत्न हाणून पाडू, अशी टिका टिकैत यांनी मोदींचे नाव न घेता केली.

कृषी कायदे रद्द होईपर्यत घरी परतायचे नाही हा आंदोलकांचा वज्रनिर्धार आहे. किमान हमी भावाचा कायदा झालाच पाहिजे, ही आमची मागणी आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यत आम्ही तसूभरही हलणार नाही, असे टिकैत यांनी स्पष्ट केले.