शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
3
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
4
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
5
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
6
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
7
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
9
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
10
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
11
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
12
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
13
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
14
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
15
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

कॉंग्रेसनेच केला बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वाधिक अपमान

By योगेश पांडे | Published: October 04, 2024 4:19 PM

किरण रिजिजू : कॉंग्रेस पक्षच संविधानाचा मारेकरी

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत कॉंग्रेसने भाजप संविधानविरोधी असल्याचा खोटा अपप्रचार केला. प्रत्यक्षात स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसनेच वारंवार संविधानाची हत्या केली. इतकेच नव्हे तर देशाला संविधान देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कॉंग्रेसलाच कंटाळून मंत्रीपदाचा राजिनामा दिला होता. कॉंग्रेसने वारंवार बाबासाहेबांचा अपमान केला होता, असा आरोप संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी लावला. नागपुरात शुक्रवारी ते पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.

लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसने अपप्रचाराचे जाळे विणले व त्यात अनुसूचित जाती तसेच जमातीचे नागरिक अडकले. प्रत्यक्षात भाजपनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना जपण्याचे मौलिक कार्य केले. कॉंग्रेसने त्यांना भारतरत्नदेखील मिळू दिले नव्हते. कॉंग्रेसचे सरकार गेल्यावरच त्यांना हा सन्मान मिळाला होता. ज्यांनी बाबासाहेबांच्या संविधानाला कधी मानले नाही तेच लोक आता संविधान हाती घेऊन राजकारण करीत आहेत, अशी टीका रिजिजू यांनी केली..

अपप्रचार सुरू राहिला तर रस्त्यावर उतरून आंदोलन

काँग्रेसच्या भूलथापांना आमचा समाज बळी पडला. काँग्रेस पक्ष हाच संविधानाचा मारेकरी आहे. त्यांना मतदान केल्यास जनता आपल्याला कधीच माफ करणार नाही. कॉंग्रेसकडून संविधानाचे नाव घेऊन अपप्रचार सुरूच राहिला तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा रिजिजू यांनी दिला.

राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले हा शापचयावेळी रिजिजू यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांच्या कुटुंबाने कधीच संविधानाचा आदर केला नाही. त्यांना संविधानाची तत्वेदेखील समजत नाहीत. ते देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते झाले हा शापच म्हणावा लागेल, असे प्रतिपादन रिजिजू यांनी केले.

प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन

केंद्र शासनाकडून राज्य शासनाच्या सहकार्याने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संविधान भवन उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. हे भवन सर्व जातीधर्मांसाठी खुले असेल. यात विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, वाचनालय, क्रीडा सुविधा उपलब्ध असतील. यासंदर्भातील प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीदेखील चर्चा झाली आहे, अशी माहिती रिजिजू यांनी दिली.

दीक्षाभूमीला दिली भेटदरम्यान, रिजिजू यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन बाबासाहेबांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेश उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम, माजी आमदार मिलींद माने, प्रदेश प्रवक्ते चंदन गोस्वामी, सुभाष पारधी, संदीप गवई प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर