शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

पवार-आझाद करणार  नागपूर विधिमंडळावरील मोर्चाचे संयुक्त नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 22:42 IST

आॅनलाईन लोकमतनागपूर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर १२ डिसेंबरला मोर्चा काढला जाणार आहे. यात शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पक्ष यासह सर्व विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत. काँग्रेसतर्फे पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे मोर्चाला संयुक्त नेतृत्व राहणार ...

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांनी घेतला तयारीचा आढावानेतृत्त्वासाठी चढाओढ नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर १२ डिसेंबरला मोर्चा काढला जाणार आहे. यात शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पक्ष यासह सर्व विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत. काँग्रेसतर्फे पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे मोर्चाला संयुक्त नेतृत्व राहणार आहे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी गुरुवारी स्पष्ट केले.अधिवेशनावर काँग्रेसतर्फे १३ डिसेंबरला तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ११  डिसेंबरला  वेगवेगळे मोर्चे काढले जाणार होते. परंतु चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून १२ डिसेंबरला संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र १२ तारखेलाच शरद पवार यांचा वाढदिवस आहे व पवार या मोर्चात सहभागी होणार असल्याने मोर्चात पवारांच्या छायेखाली काँग्रेस दबल्या जाईल, या भितीने काँगे्रसच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली होती. पवारांच्या नेतृत्वावर काहींनी नाराजीही व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर पवार व आझाद हे मोर्चाचे संयुक्त नेतृत्व करणार असल्याचे स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिल्याने काँग्रेसजणांना दिलासा मिळाला आहे. मोर्चासाठी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. परंतु गुजरात निवडणुकीमुळे त्यांचा व्यस्त कार्यक्रम असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.मोर्चाच्या तयारीसाठी चव्हाण यांनी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांची मंगल कार्यालयात आढावा बैठक घेतली. जिल्हानिहाय आढावा घेतला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, आ. विजय वडेट्टीवार, सुनील केदार,माजी खासदार मारोतराव कोवासे, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, माजी आ. एस.क्यू. जमा,सुभाष धोटे, अविनाश वारजूरकर, डॉ.बबनराव तायवाडे, अनंतराव घारड, सुरेश भोयर, प्रफुल्ल गुडधे, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, अ‍ॅड.अभिजित वंजारी, रवींद्र दरेकर, नाना गावंडे, चंद्रपाल चौकसे, कुंदा राऊत, बंडू धोत्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.टी पॉईंट चौकात दोन्ही मोर्चे एकत्र  विधानभवनावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वेगवेगळ्या ठिकाणावरून मोर्चे निघतील. परंतु टी-पॉईट चौकात भेटतील. येथे संयुक्त जाहीर सभा होईल, असे चव्हाण यांनी सांगितले.कर्जमाफीच्या नावाखाली फसवणूकदोन वर्षापूर्वी काँग्रेसने कर्जमाफीसाठी भव्य मोर्चा काढला होता. आता परिस्थिती आणखी बिकट झाली. ९० लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा केली होती. पण चार ते पाच हजार शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळाली. कर्जमाफीच्या नावाखाली भाजपा सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.खा. अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Politicsराजकारण