शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
2
१०० हून अधिक लढाऊ विमाने... पाच शहरांवर हल्ला... इराणचे किती झाले नुकसान?
3
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
4
PAK vs ENG : इंग्लंडची दाणादाण, पाकिस्ताननं रचला इतिहास; अखेर शेजाऱ्यांनी मालिका जिंकली
5
धक्कादायक! बनावट ईडीच्या पथकाचा व्यावसायिकाच्या घरावर छापा; वकिलाने आयकार्ड मागताच...
6
मविआ जागावाटपावर राहुल गांधी नाराज असल्याच्या चर्चा; वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
7
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
8
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
9
Yes Bank च्या शेअरमध्ये मोठी घसरण, यामागचं कारण काय? ५ दिवसांत ९ टक्क्यांनी आपटला
10
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
11
'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' सांगणारा 'धर्मवीर २' OTT वर रिलीज! या ठिकाणी घरबसल्या पाहू शकता
12
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
13
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
14
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
15
न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान
16
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
17
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात हा दिला उमेदवार
18
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
19
दिवाळीपूर्वी रमा एकादशी: व्रतपूजन कसे करावे? धन-वैभव-समृद्धी लाभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर

'उघड्यावरील शौच संपले तसे शिक्षणातून महिलांचे ड्रॉप आऊटही संपेल!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2023 9:53 PM

Nagpur News येत्या दहा वर्षात स्त्रियांच्या शिक्षण ड्रॉप आऊटपासून मुक्ती मिळेल असा विश्वास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देप्रांजली जयस्वाल यांना ‘रमाबाई रानडे स्मृती शिक्षण - प्रबोधन पुरस्कार’ प्रदान

नागपूर : आपण परिवर्तनाच्या अशा टर्निंग पॉइंटवर उभे आहोत, जेथून सभ्यता पुनरूज्जीवनाच्या आशेची किरणे दिसू लागली आहेत. २०१४ मध्ये लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर शौचालय’चा नारा दिला आणि महिलांना उघड्यावरील शौचालयाकडे जाण्यापासून मुक्ती मिळाली. अशीच मुक्ती शिक्षणाच्या क्षेत्रात ड्रॉप आऊटपासून (अर्ध्यात शिक्षण सोडून देणे) येत्या दहा वर्षात मिळेल आणि नव्या राष्ट्रीय शिक्षण नितीची त्यात मोलाची भूमिका राहील, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

सोमवारी सेवा सदन शिक्षण संस्थेच्या ९६व्या वर्धापनदिनानिमित्त अकोला जिल्ह्यातील एन्करेज एज्युकेशनल फाउंडेशनच्या प्रांजली जयस्वाल यांना ‘रमाबाई रानडे स्मृती शिक्षण - प्रबोधन पुरस्कार’ प्रदान करताना ते बोलत होते. शिक्षण संस्थेच्या पटांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रा. स्व. संघाच्या अ. भा. कार्यकारिणीचे सदस्य अनिरूद्ध देशपांडे, भारतीय संगणक विज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध लेखक यशवंत कानेटकर, माजी आमदार नागो गाणार, संस्थेच्या अध्यक्ष कांचन गडकरी, सचिव वासंती भागवत उपस्थित होते.

भारतीयत्त्वाच्या दिशेने राबविण्यात येणारी राष्ट्रीय शिक्षण नीती आता आली असली तरी भारतीय विद्या भारती, रामकृष्ण मिशनसारख्या संघटनांनी गेल्या ७० वर्षांत त्याच दिशेने कार्य केले. याच कार्याच्या प्रेरणेने ही नीती कार्यरत राहणार आहे. या नीतीमध्ये संस्काराला महत्त्व असून, चुकीच्या पद्धतीने शिक्षण दिले गेले तर ‘साक्षर’च्या उलट ‘राक्षस’ घडणार ही जाणीव यात आहे. भारताला संपविण्यासाठी आलेले स्वत: समाप्त झाले आणि आताही जे अशी स्वप्न बघत आहेत, तेही स्वत:च संपणार आहेत. भारत एव्हरेस्टप्रमाणे निधडी छाती दाखवत उभा राहणार असल्याची भावना भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन अमर कुळकर्णी यांनी केले. प्रास्ताविक कांचन गडकरी यांनी केले, तर मानपत्राचे वाचन वासंती भागवत यांनी केले. एकल गीत बाळकृष्ण गड्डमवार यांनी गायले.

शिक्षणात आता स्वदेश - अनिरूद्ध देशपांडे

- आजही साडेतीन कोटी मुले शिक्षणापासून वंचित आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून ही उणीव भरून काढली जाणार आहे. शिक्षणात आता स्वदेश असणार आहे. आता आर्य चाणक्य, महात्मा गांधी, विवेकानंद हे शिकविले जाणार आहेत. सर्वांना शिक्षण, सर्वांना संधी या घोषवाक्याद्वारे शिक्षणातील हे परिवर्तन साधले जाणार असल्याचे अनिरूद्ध देशपांडे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी बोलताना यशवंत कानेटकर यांनी भाषा कोणतीही असो, मांडण्यात येणारा मुद्दा प्रखर असेल तर तो महत्त्वाचा असल्याची भावना व्यक्त केली.

.....................

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी