शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

फटाकेबंदीवर पर्यावरणमंत्र्यांचा ‘सावध’ पवित्रा; ठोस उत्तर देण्याचे टाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 20:47 IST

फटाकेबंदीच्या मुद्यावरून आॅक्टोबर महिन्यात शिवसेनेमध्येच दोन गट पडल्याचे दिसून आले होते. विधान परिषदेत हा मुद्दा आल्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी सावध पवित्रा घेतला.

ठळक मुद्देकायद्यावर मौन, जनजागृतीवर भरयंदा ७० टक्के घट झाल्याचा दावा

योगेश पांडेआॅनलाईन लोकमतनागपूर : फटाकेबंदीच्या मुद्यावरून आॅक्टोबर महिन्यात शिवसेनेमध्येच दोन गट पडल्याचे दिसून आले होते. विधान परिषदेत हा मुद्दा आल्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी सावध पवित्रा घेतला. फटाकेबंदीच्या विरोधकांच्या मागणीवर कुठलेही ठोस उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. सण साजरे होताना फटाके फुटलेच पाहिजे असे म्हणत कायद्याऐवजी जनजागृतीवरच भर देण्याची भूमिका मांडली.शहरातील प्रदूषणाच्या पातळीतील वाढीचा मुद्दा अनंत गाडगीळ यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मांडला होता. यावरील चर्चेदरम्यान डॉ.सुधीर तांबे यांनी फटाकेबंदी करणार का असा प्रश्न उपस्थित केला. दिवाळीत फटाकेबंदीच्या मुद्यावरून दोन नेत्यांमध्ये फटाके फुटले. सण साजरे झालेच पाहिजे. सणांमध्ये फटाके फोडले जातात. मात्र फटाके फोडण्याचे प्रमाण जनजागृतीच्या माध्यमातून कमी होऊ शकते. यासाठी कुठलाही कायदा करण्याची गरज नाही. या वर्षी शालेय विद्यार्थ्यांमध्ये केलेल्या जनजागृतीमुळे ७० टक्के कमी फटाके फुटले. कुठलाही कायदा न करता प्रमाण कमी झाले आहे. फटाके फुटले पाहिजे व प्रदूषणही होता कामा नये, असे प्रतिपादन त्यांनी केले. मात्र फटाके फुटल्यानंतर प्रदूषण कसे कमी होणार किंवा याबाबत राज्य शासनाची नेमकी काय भूमिका राहील, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.जुन्या इमारतींना ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य करणारमुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये काँक्रिटीकरणात वाढ झाली असून यामुळे भूजलपातळी कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता राज्य शासनातर्फे नवीन नियम लागू करण्यात आले असून विकासकांना ३० टक्के जमिनीवर काँक्रिटचे काहीच काम करता येणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच नवीन इमारतींसोबतच जुन्या इमारतींनादेखील ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासन रामदास कदम यांनी दिले.मोठ्या चौकांत लावणार धूर शोषणारी यंत्रेराज्यातील अनेक शहरांमध्ये वाहनांमुळे प्रचंड प्रदूषण होते. ही बाब लक्षात घेता ‘नीरी’ व ‘आयआयटी’च्या माध्यमातून विशेष यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. या यंत्रांच्या माध्यमातून वाहनांतून निघणारा धूर शोषून घेता येऊ शकतो. यासंदर्भात परीक्षण सुरू असून लवकरच पुढील पावले उचलण्यात येतील, अशी माहिती पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी दिली. तर डिझेल वाहनांची तपासणी करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यासंदर्भात परिवहन विभागाला पर्यावरण मंत्रालयामार्फत सूचना करण्यात येतील, असे आश्वासन यावेळी कदम यांनी दिले.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Ramdas Kadamरामदास कदम