शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

कस्तूरचंद पार्कला मिळाले ५० लाख रुपये : हायकोर्टात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 22:40 IST

Kasturchand Park gets Rs 50 lakh, Nagpur news सिव्हील लाईन्स येथील हेरिटेज कस्तूरचंद पार्क मैदानाचे समतलीकरण करण्यासाठी राज्य सरकारने ५० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देमैदानाचे समतलीकरण केले जाईल

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : सिव्हील लाईन्स येथील हेरिटेज कस्तूरचंद पार्क मैदानाचे समतलीकरण करण्यासाठी राज्य सरकारने ५० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती देण्यात आली.

यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. २०१७ मध्ये उच्च न्यायालयाने कस्तूरचंद पार्कच्या दुरवस्थेची दखल घेऊन स्वत:च ही याचिका दाखल करून घेतली होती. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी न्यायालयाला ही माहिती दिली. तसेच, उर्वरित निधी अन्य माध्यमातून मिळवून मैदान समतलीकरणाचे काम तातडीने पूर्ण केले जाईल असे सांगितले.

विविध विकास कामे, मुसळधार पाऊस व देखभालीकडे दुर्लक्ष यामुळे कस्तूरचंद पार्क मैदान ठिकठिकाणी उंच-सखल झाले आहे. तसेच, मैदानावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने नागरिकांना चांगल्या पद्धतीने खेळता यावे याकरिता मैदानाचे समतलीकरण करण्याचा आदेश दिला होता. सरकार त्या आदेशाचे पालन करीत आहे. सुरुवातीला सरकारने निधीच्या कमतरतेचे कारण सांगून विषय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, न्यायालयाने सरकारला योग्य समज देऊन हे काम करणे आवश्यक असल्याचे बजावले होते. प्रकरणावर आता २५ नोव्हेंबर राेजी पुढील सुनावणी होईल. न्यायालय मित्र ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी याचिकेचे, ॲड. गिरीश कुंटे यांनी नासुप्रतर्फे तर, ॲड. जेमिनी कासट यांनी मनपातर्फे कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयKasturchand Parkकस्तूरचंद पार्क