शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
2
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
3
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
4
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
5
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
6
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
7
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
8
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
9
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
10
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
11
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
12
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
13
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
14
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
15
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
16
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
17
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
18
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
19
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
20
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 

दहावीत काव्या गुप्ता, बारावीत ओम बरीक विभागातून टाॅपर

By निशांत वानखेडे | Published: May 13, 2023 6:21 AM

यंदाही मुलींचाच डंका वाणिज्य शाखेत महिता गुप्ता, मानव्यशास्त्र शाखेत अभिनव साेमानी प्रथम

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ने शुक्रवारी दहावी व बारावीचे निकाल जाहीर केले. दाेन्ही परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. दहावी परीक्षेत काेराडी राेडवरील पाेद्दार वर्ल्ड स्कूलची काव्या गुप्ता ९९.६ टक्के गुणांसह नागपूरात टाॅपर ठरली आहे. बारावीच्या विज्ञान विभागात स्कूल ऑफ स्काॅलर, अत्रे ले-आउटचा ओमप्रकाश बरीक हा ९८.२० टक्के गुणांसह अव्वल आला आहे.

बारावीच्या परीक्षेत नागपूर क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले आहे. विज्ञान, वाणिज्य व मानव्यशास्त्र विषयात ९० टक्क्याच्या वर निकाल लागला. अनेक महाविद्यालयांनी शंभरीही गाठली आहे. विज्ञान शाखेत ओमप्रकाश बरीक शिवाय वाणिज्य शाखेत भवन्स, सिव्हील लाईन्सची महिता गुप्ता प्रथम आणि हर्षिता शर्माने संभाव्य द्वितीय स्थान प्राप्त केले आहे. मानव्यशास्त्र शाखेत सेंटर पाॅइंट स्कूल, वर्धमाननगरचा अभिनव साेमानी यांनी अव्वल स्थान पटकाविले आहे. श्रीकृष्णनगर भवन्स येथील कनकलता विष्णू बांबल हिने ९७.२ टक्के गुणांसह संभाव्य दुसरे स्थान प्राप्त केले आहे.

दहावीच्या परीक्षेत काव्या गुप्ता नंतर आष्टी भवन्सचा देवांश डोका हा विद्यार्थी ९९.४ टक्के गुण घेऊन संभाव्य द्वितीय स्थान मिळविले. तर सेंट पॉल शाळेचा साहील सोनी हा ९९ टक्के गुण घेऊन संभाव्य तिसरा राहिला. नारायणाची आरोही उके आणि सांदिपनीचा चक्रवर्ती हे सुद्धा ९९ टक्के गुण घेऊन संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत.

१२ वीच्या परीक्षेत ४४ हजारावर विद्यार्थ्यांनी ९५ टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त केेले. एकूण निकालाचा विचार केला तर ८७..३३ टक्के विद्यार्थ्यांनी १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण केली. परीक्षेत ८४.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ९०.६८ टक्के विद्यार्थिनी यशस्वी ठरल्या. तसेच १.१२ लाख विद्यार्थ्यांनी ९० टक्के गुण प्राप्त केले. दुसरीकडे दहावीच्या परीक्षेत २१ लाख ८६ हजार ९४० विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेत ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींची टक्केवारी चांगली राहिली. ९४.२५ टक्के मुली तर ९२.७२ टक्के मुलं या परीक्षेत यशस्वी ठरले. म्हणजेच मुलांच्या तुलनेत मुली १.९८ टक्के अधिक उत्तीर्ण झाल्या.

- आचानक लागल्याने शाळांचा गोंधळ

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या निकालाच्या संदर्भात गेल्या चार पाच दिवसांपासून चर्चा होतीच. पण शुक्रवारी अचानक दुपारी बारावीचा निकाल जाहीर झाला आणि त्या पाठोपाठच दहावीचाही निकाल सीबीएसईने जाहीर केला. अचानक लागलेल्या निकालामुळे टक्केवारी काढण्यात शाळांचा गोंधळ उडाला होता. विद्यार्थ्यांनाही अचानकच निकालाची माहिती मिळाल्याने ते ही आश्चर्यचकित होते. रात्री उशीरापर्यंत शाळेतील शिक्षक निकालाच्या गडबडीतच होते.