शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

मुलांना शाळेत पाठविताय? स्कूल बॅगेत 'या' वस्तू ठेवायला विसरू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 17:02 IST

नवीन कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शासनाने शाळा सुरू करताना कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला पाठविल्या आहेत. पालकांनीही मुलांना शाळेत पाठवितांना काही खबरदारी घ्यायची आहे.

नागपूर : शहरात अजूनही १ ते ७ च्या शाळा सुरू झाल्या नाहीत. पण ८ ते १२ चे वर्ग सुरू झाले आहे. मात्र ग्रामीणमध्ये आता १ ते १२ चे सर्वच वर्ग प्रत्यक्षात सुरू झाले आहे. नवीन कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शासनाने शाळा सुरू करताना कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला पाठविल्या आहेत. शिक्षण विभाग शाळांकडून त्या पूर्णही करून घेईल. पण पालकांनीही मुलांना शाळेत पाठवितांना काही खबरदारी घ्यायची आहे.

सॅनिटायझर

शालेत सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. शाळेत सॅनिटायझर असेल नसेल पण मुलांच्या सोबत त्याच्या स्कूल बॅगमध्ये सॅनिटायझरची बॉटल नक्कीच पाठवा आणि मुलांना सॅनिटायझर वापरण्याची सवय करा.

एक मास्क तोंडाला, दुसरा बॅगेत

विद्यार्थ्यांना शाळेत मास्क अत्यावश्यक केले आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आता दोन मास्क ठेवावे लागणार आहे. एक मास्क विद्यार्थ्यांच्या तोंडाला तर दुसरा स्कूल बॅगेत ठेवावा लागणार आहे. विशेष म्हणजे याबाबत शाळेने पालकांना सूचना केल्या आहेत.

डबा शेअरींग बंद

शाळांमध्ये पूर्वी डबा खायची सुट्टी होती. परंतु शासनाने कोरोनाची खबरदारी लक्षात घेता आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेतला. शाळेचा कालावधी ३ ते ४ तासांचा ठेवला आहे. त्यात डबा खाण्याची सुट्टी बंद केली आहे. याबाबतच्या सूचना आरोग्य विभागानेही केल्या आहेत.

सर्दी, डोकेदुखी असेल तर शाळेला बुट्टी

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्दी, डोकेदुखी, ताप असल्यास त्यांनी शाळेत जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षण व आरोग्य विभागाने केल्या आहेत. तरीही पालकांनीही व शिक्षकांनीही त्यांना शाळेत पाठविण्यासाठी अथवा येण्यासाठी आग्रह धरू नये.

प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पौष्टीक आहार सेवन करणे आवश्यक आहे. हिरव्या ताज्या पालेभाज्या कडधान्य तसेच अंडीचा आहारात समावेश असावा. नियमित व्यायाम, योगासने केल्याने आरोग्य चांगले राहून रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

डॉ. संदीप मोगरे, बालरोग तज्ञ

दिवसातून एकदा प्राणायाम हवाच

नियमित प्राणायाम केल्याने रोग प्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिवसातून एकदा प्राणायाम करणे आवश्यक आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Healthआरोग्यSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस