शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

केरळच्या दांपत्याची नागपुरात आत्महत्या, मुलीलाही विष पाजले

By योगेश पांडे | Updated: July 5, 2024 18:42 IST

Nagpur : पत्नीच्या आजारपणामुळे उचलले टोकाचे पाऊल

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन महिन्यांअगोदर केरळहून नागपुरला आलेल्या एका दांपत्याने विष प्राशन करत आत्महत्या केली. तर ११ वर्षीय मुलीलादेखील विष पाजत जीव घेण्याचा प्रयत्न केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही ह्रद्यद्रावक घटना घडली आहे. या दांपत्यापैकी पत्नीच्या आजारपणामुळे हे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रिजू विजयन उर्फ विजय नायर ( ४०) आणि प्रिया रिजू नायर (वय ३४) अशी मृतक दांपत्याची नावे आहेत. तर त्यांची मुलगी वैष्णवी (११) ही मृत्यूशी झुंज देत आहे. नायर कुटुंबीय नारा मार्गावरील गजानन आरकेएस पब्लिक स्कूलजवळील प्रकाश वाडी यांच्या घरी किरायाने राहत होते. तीन महिन्यांअगोदरच ते नागपुरात आले होते. त्यांनी गुरुवारी मोनोकीम नावाचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी नायर दाम्पत्य व मुलगी वैष्णवी हिच्यासोबत बैशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी नायर दाम्पत्याला तपासून मृत घोषित केले. वैष्णवीवर उपचार सुरू आहेत.

रिजू व त्यांचे कुटुंब मूळ केरळ येथील आहे. त्यांना दोन मुली आहेत. त्यांची पत्नी प्रिया हिला रक्ताचा कर्करोग असल्याने तिच्या उपचारासाठी ते नागपुरात आले होते. लहान मुलगी वैष्णवीसुद्धा त्यांच्यासोबत आली. प्रियावर शहरातील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयात त्यांचा उपचार सुरू होता. रिजू केरळ येथे पेंटिंगची कामे करीत असे. तीन महिन्यांत उपचारावर त्यांचा बराच खर्च झाला. आर्थिक अडचण व आजारपण यामुळे ते तणावात होते. त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. वैष्णवीवर मेयो इस्पितळात उपचार सुरू असून तिच्या बयाणातून आत्महत्येचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर