शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

बिनविरोध की रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 4:08 AM

जिल्ह्यातील १३० ग्रा.पं.साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात : गावागावात राजकीय मोर्चेबांधणी नागपूर : जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज ...

जिल्ह्यातील १३० ग्रा.पं.साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात : गावागावात राजकीय मोर्चेबांधणी

नागपूर : जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली. निवडून येऊ शकणाऱ्या उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी गावगाड्यात ऐन थंडीत राजकीय पारा चढला आहे. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध करा, असे आवाहन उमरेडचे आ. राजू पारवे यांनी केले आहे. मात्र ५ जानेवारीनंतरच जिल्ह्यातील किती ग्रा.पं.मध्ये निवडणूक बिनविरोध होणार, हे स्पष्ट होईल.

जिल्ह्यात निवडणूक होऊ घातलेल्या सर्वाधिक ग्रा.पं. उमरेड विधानसभा क्षेत्रातील आहेत. यात उमरेड तालुक्यातील १४, कुही तालुक्यातील २५ आणि भिवापूर तालुक्यातील ३ ग्रा.पं.चा समावेश आहे. या ४२ ही ग्रा.पं.मध्ये यापूर्वी बिनविरोधाची परंपरा नाही.

कामठी तालुक्यात नऊ ग्रा.पं.साठी निवडणूक होऊ घातली आहे. पूर्वीच्या टर्ममध्ये या सर्वच ग्रा.पं.साठी निवडणूक झाली होती. यावेळीही येथे काँग्रेस विरुद्ध भाजपा असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. तालुक्यात २०१७ मध्ये गादा ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली होती, हे विशेष.

सावनेर तालुक्यातील १२ ग्रा.पं.साठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गतवेळी यात जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र यावेळी येथे काँग्रेस समर्थक आणि अपक्षांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत.

हिंगणा तालुक्यात एकूण पाच ग्रा.पं.साठी निवडणूक होऊ घातली आहे. आधी तालुक्यातील ४८ ग्रा.पं.साठी निवडणूक झाली होती. तीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असाच सामना रंगला होता. त्यामुळे निवडणूक होऊ घातलेल्या पाच ग्रा.पं.मध्ये राजकीय समर्थक मैदानात उतरले.

जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यात एकाही ग्रा.पं.मध्ये सध्या तरी बिनविरोध निवडणूक होणार नसल्याचे चित्र आहे. सर्वच ठिकाणी महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात सामना रंगण्याची स्थिती आहे.

जामगाव (बुजुर्ग) आदर्श

नरखेड तालुक्यात २०१८ मध्ये झालेल्या ३० ग्रामपंचायत निवडणुकीत येनिकोनी ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक पार पडली होती. तालुक्यातील जामगाव (बुजुर्ग) ग्रामपंचायतची निवडणूक स्वातंत्र्य मिळाल्यापासून बिनविरोध होत आहे. अपवाद फक्त २०१८ चा आहे. या गावात प्रत्येक पक्षाचे तालुकास्तरीय नेते आहेत. गावातील पंचायत समिती नरखेडचे माजी सभापती वसंत चांडक यांनी सांगितले की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वोदयी विचारसरणीचे माजी आमदार स्व. जीवनलाल चांडक व काँग्रेस विचारसरणीचे पंचायत समिती माजी सभापती स्व. वसंतराव काळमेघ यांनी गावात स्थानिक राजकारणावरून वादावादी होऊ नये याकरिता सर्वांना प्रतिनिधित्व देण्याचे ठरवून, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरविले होते. यानंतर ही परंपरा सुरू झाली. शासनाने अनेकदा बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींकरिता विशेष अनुदान जाहीर केले, परंतु जामगाव बुजुर्गला आजवर विशेष अनुदान मिळाले नाही.

---

लोकशाहीत मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र गावाच्या विकासासाठी गावकरी एकत्र येत ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध करीत असतील तर अशा गावातील विकास कामांना गती मिळते. तिथे खऱ्या अर्थाने ग्राम अभियानाला लोकांचे पाठबळ मिळते. त्यामुळे इलेक्शनपेक्षा सामंजस्याने सिलेक्शन झाल्यास गावात विकासाचे राजकारण शक्य आहे.

- डॉ. राजेश ठाकरे, जिल्हाध्यक्ष, ग्रामविकास आघाडी, भाजपा

---------

गावाच्या विकासासाठी गावकरी एकत्र येत निवडणूक बिनविरोध करीत असतील तर ही स्वागतार्ह बाब आहे. निवडणूक म्हटली तर मनभेद आलेच. त्यामुळे ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाल्यास त्या गावाच्या विकासाला गती मिळते. गावाची समाजात प्रतिष्ठा वाढते.

प्रा. अवंतिका लेकुरवाळे

कामठी विधानसभा प्रमुख, काँग्रेस, महिला आघाडी

-

प्रत्येक गावाचे राजकारण वेगळे असते. या राजकारणामुळे गावात नेहमीच दोन गटात तेढ निर्माण होत असते. अशा वेळी गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्र येत ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतल्यास लोकशाहीला खऱ्या अर्थाने ताकद मिळते. गावाच्या विकासाला गती मिळते.

समीर उमप, जि.प. सदस्य (शेकाप)

-

निवडणुका जाहीर झालेल्या प्रमुख ग्रा.पं.

भोरगड, जलालखेडा, उमठा, महेंद्री, खुबाळा, खुर्सापार, टेंभूरडोह, पाटणसावंगी, कोहळी, सोनपूर (अदासा), किरणापूर, देवलापार, खेडी, माहुली, नवेगाव, निमखेडा, कोराडी, कळमना (बेला), राजोला, दवलामेटी, द्रुगधामना, सुराबर्डी.