शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
2
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
3
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
4
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
5
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
6
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
7
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
8
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
9
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
10
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
11
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
12
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
13
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
14
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
15
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
16
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
17
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
18
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
19
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
20
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 

'हे' आहे चित्ता शावकांच्या मृत्यूचे कारण...; अभ्यासातील वास्तव 

By निशांत वानखेडे | Published: May 28, 2023 7:09 PM

वर्षभरापूर्वी नामिबियामधून आणलेल्या आणि मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यात ठेवलेल्या चित्त्याच्या तीन शावकांच्या मृत्युमुळे वेगवेगळ्या शंकाकुशंका उपस्थित होत आहेत.

नागपूर : वर्षभरापूर्वी नामिबियामधून आणलेल्या आणि मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यात ठेवलेल्या चित्त्याच्या तीन शावकांच्या मृत्युमुळे वेगवेगळ्या शंकाकुशंका उपस्थित होत आहेत. चित्त्यांची प्रजाती भारतात टिकणारच नाही, अशी मते व्यक्त केली जात आहेत. मात्र चित्ते जगणार नाही, अशी भविष्यवाणी करणे चुकीचे आहे, असे मत चित्ता लेडी म्हणून प्रसिद्ध डॉ. प्रज्ञा गिरडकर यांनी व्यक्त केले. मात्र सध्या ते देखरेखीखाली बंदिवासात असून तेच त्यांच्या मृत्युचे कारण असल्याचे त्यांनी एका संशोधनावरून नमूद केले आहे. डॉ. प्रज्ञा गिरडकर या भारताच्या पहिल्या चित्ता संरक्षण म्हणून ओळखल्या जात असून नामिबियामध्ये राहून त्यांनी चित्त्यांच्या हालचालीवर अभ्यास केला आहे. त्यांनी अनुवंश शास्त्रज्ञ डॉ. स्टिफन ओब्रायन व डॉ. लॉरी मार्कर यांनी १९८५ साली सादर केलेल्या संशोध अहवालात चित्ता शावकांच्या मृत्युचे कारण नोंदविले आहे. वेगवेगळे वनक्षेत्र व चित्त्यांच्या अधिवासात शावकांच्या हालचालींचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या संशोधनानुसार बंदिवासात देखरेखीखाली असलेल्या चित्त्यांच्या शावकांचा मृत्युदर ७० टक्क्यांच्या वर असतो.

कुनो अभयारण्यात असलेल्या ज्वाला’ नामक मादी चित्त्याचे हे शावक असून आता केवळ एक शावक जिवंत राहिला आहे. डॉ. गिरडकर यांनी सांगितले चित्ता ही अतिशय संवेदनशील प्रजाती आहे. त्यांच्यामध्ये अनुवांशिक विविधता कमी असते. त्यामुळे तो अतिसंवेदनशील गटात गणला जातो. कधीकाळी एकट्या भारतात १०,००० चित्ते होते पण शिकारीमुळे त्यांचे अनैसर्गिक मृत्यु झाले व ही प्रजाती भारतातून नामशेष झाली. आता जगभरात केवळ ७००० चित्ते शिल्लक आहेत. गेल्या वर्षी नामिबियामधून चित्ते आणून एक प्रयोग केला जात आहे.  गिरडकर यांच्या मते आफ्रिकेत वाळवंटी प्रदेशात दिवसा अतिउष्णता व रात्री अति थंडी असते. अशा वातावरणात राहणारे चित्ते भारतीय वातावरणात रुळायला निश्चितच वेळ लागेल. बंदिवासात असल्याने त्यांना मुक्त संचार करण्यासाठी वाव मिळत नाही. त्यांच्यात हवी तशी रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही. मात्र सध्यातरी या पाहुण्यांनी भारतीय वातावरणाशी जुळवून घेतले असून नैसर्गिक अधिवासात गेल्यानंतरच त्यांच्यातील प्रतिकारशक्ती वाढेल आणि या वातावरणात टिकून राहण्याची त्यांची क्षमता समजेल, असा विश्वास डॉ. गिरडकर यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :nagpurनागपूर