शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

कोंढाळी, नीलडोह, डिगडोह ग्रामपंचायत निवडणुकीला स्थगिती, हायकोर्टाचा अंतरिम आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 11:34 AM

राज्य सरकार, निवडणूक आयोगाला नोटीस

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी नगर परिषद व नगर पंचायत रुपांतराची प्रक्रिया लक्षात घेता कोंढाळी, नीलडोह व डिगडोह (देवी) या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला अंतरिम स्थगिती दिली आहे. तसेच, नगरविकास विभागाचे सचिव, ग्रामविकास विभागाचे सचिव, राज्य निवडणूक आयोग व ग्रामपंचायत सचिवांना नोटिसा बजावून यावर येत्या मंगळवारपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

नगरविकास विभागाच्या सचिवांनी महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्याेगिक वसाहती कायद्यातील कलम ३४१(ए) अंतर्गतच्या अधिकारानुसार डिगडोह ग्रामपंचायतचे नगर परिषद, तर कोंढाळी, नीलडोह व बिडगाव-तरोडी (खुर्द) ग्रामपंचायतचे नगर पंचायतमध्ये रूपांतर करण्यासाठी २१ जून, ११ ऑगस्ट व ३१ ऑगस्ट रोजी मसुदा अधिसूचना जारी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी १४ ऑगस्ट व २५ सप्टेंबर रोजी नगरविकास विभागाला पत्र पाठवून यावर कोणालाही आक्षेप नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे या चारही ग्रामपंचायतींना संबंधित वरिष्ठ दर्जा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. असे असताना राज्य निवडणूक आयोगाने ३ ऑक्टोबर रोजी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

परिणामी, काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष चरणसिंग ठाकूर, बालकिसन पालिवाल व श्यामराव तायवाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सलील देशमुख व केशव धुर्वे यांनी कोंढाळी, तर आमदार समीर मेघे यांनी सरपंच वनिता गडमाडे यांच्यासोबत मिळून नीलडोह आणि सरपंच इंद्रायणी काळबांडे यांच्यासोबत मिळून डिगडोह ग्रामपंचायत निवडणुकीविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकांवर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. मोहित खजांची, ॲड. महेश धात्रक व ॲड. रितेश दावडा यांनी कामकाज पाहिले.

नगरविकासचे आयोगाला पत्र

५ ऑक्टोबर रोजी नगरविकास विभागाच्या सचिवांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांना पत्र पाठवून संबंधित वरिष्ठ दर्जाची अंतिम अधिसूचना जारी होईपर्यंत या चारही ग्रामपंचायतींची निवडणूक घेऊ नका, अशी विनंती केली आहे. त्यावर निर्णय व्हायचा आहे. परिणामी, उच्च न्यायालयाने हा अंतरिम आदेश दिला.

‘लोकमत’ने वेधले होते लक्ष

नगर परिषद व नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे या चारही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक का, असा प्रश्न ‘लोकमत’ने उपस्थित करून याकडे जिल्हा प्रशासन व राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले होते. तसेच, आता ग्रामपंचायत निवडणूक घेतल्यास काही दिवसाने नगर परिषद व नगरपंचायत निवडणूक घ्यावी लागेल. परिणामी, अतिरिक्त सार्वजनिक निधी खर्च होईल. सरकारी यंत्रणेची ऊर्जा व वेळ वाया जाईल, असा दावा केला होता.

बीडगाव-तरोडीचे काय?

बीडगाव-तरोडी ग्रामपंचायत निवडणुकीविरुद्ध कोणीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली नाही. त्यामुळे या निवडणुकीला अंतरिम स्थगिती मिळाली नाही. या परिस्थितीत नागरिकांपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या ग्रामपंचायतीची निवडणूक होईल की नाही, अशी विचारणा एकमेकांना केली जात आहे.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक