शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

नागपूर शहरातील तलावात आॅक्सिजनची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 22:02 IST

शहरातील तलावात आॅक्सिजनची मात्रा कमी होत आहे. प्रदूषणामुळे तलावातील जलचर आॅक्सिजनसाठी तडफत आहे. यात सर्वाधिक गंभीर स्थिती फुटाळा तलावाची आहे. गांधीसागर तलावाची अवस्थासुद्धा काहीशी अशीच आहे, असा खुलासा ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनद्वारे करण्यात आला आहे.

ठळक मुद्देफुटाळा तलावाची अवस्था गंभीर : विसर्जनानंतर तलावाची दुरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तलावात आॅक्सिजनची मात्रा कमी होत आहे. प्रदूषणामुळे तलावातील जलचर आॅक्सिजनसाठी तडफत आहे. यात सर्वाधिक गंभीर स्थिती फुटाळा तलावाची आहे. गांधीसागर तलावाची अवस्थासुद्धा काहीशी अशीच आहे, असा खुलासा ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनद्वारे करण्यात आला आहे.अमेरिकेची प्रसिद्ध पर्यावरण संस्था ‘अर्थ इको इंटरनॅशनल’ सोबत मिळून फाऊंडेशनने शहरातील तीन मुख्य तलावांवर निरीक्षण केले. अर्थ इको इंटरनॅशनल दरवर्षी जगभरातील नदी, तलावाचे पाणी गुणवत्ता व प्रदूषणावर पुस्तक प्रकाशित करते. यात १४६ देशांचा समावेश आहे. दरवर्षी ग्रीन व्हिजिल गणपती विसर्जनापूर्वी व विसर्जनानंतर शहरातील तलावाच्या पाण्याचे नमुने घेऊन त्याचे निरीक्षण करते. त्यांनी केलेल्या निरीक्षणात फुटाळा तलावात आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. सोनेगावची स्थिती चांगलीफाऊंडेशनतर्फे करण्यात आलेल्या निरीक्षणात सोनेगावची स्थिती चांगली आढळली आहे. कारण सोनेगाव तलावात यावर्षी विसर्जनास बंदी होती. त्यामुळे तलावातील पाण्यात डिजॉल्ड आॅक्सिजन, टर्बिडीटी आणि पीएचच्या पातळीत फार फरक आढळून आला नाही. गांधीसागरवर परिणाममनपाने विसर्जनासाठी बंदी घातल्यानंतरही गांधीसागर तलावात विसर्जन झाले आहे. त्याचा परिणाम तलावातील डिजॉल्ड आॅक्सिजन मात्रेवर पडला आहे. गणपती विसर्जनापूर्वी तलावातील डिजॉल्ड आॅक्सिजन ४.५ ते ५ मिलिग्राम होते. विसर्जनानंतर ते ४ ते ४.५ मिलिग्रामवर आले आहे. टर्बिडीटीचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. फक्त पाण्याचा पीएच कायम आढळला आहे. फुटाळ्याला बसला फटकाविसर्जनाचा सर्वाधिक भार फुटाळा तलावावर असल्याने फुटाळ्याची प्रदूषणाची पातळी चांगलीच फुगली आहे. फुटाळा तलावात आॅक्सिजनच्या मात्रेत एक मिलिग्रामची घट दिसून आली आहे. टर्बिडीटीची मात्रासुद्धा १० जेटीयुने वाढली आहे. पाण्याचा पीएच ८ ते ८.५ दरम्यान आहे. तलावाच्या इको सिस्टमवर होतोय परिणामतलावातील पाण्यात आॅक्सिजनची मात्रा कमी झाल्याने त्याचा परिणाम जलचरावर होतो. फुटाळ्यात मोठ्या प्रमाणात झालेले विसर्जन लक्षात घेता, त्याची सफाई लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. फुटाळ्यातील बंद पडलेले कारंजे तत्काळ सुरू करणे आवश्यक आहे. डिजॉल्ड आॅक्सिजनची मात्रा दोन मिलिग्रामपर्यंत गेल्यास तलावाची इको सिस्टम बिघडू शकते.कौस्तुभ चटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन

टॅग्स :Futala Lakeफुटाळा तलावnagpurनागपूर