शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

तलावांनी घेतला मोकळा श्वास, पाण्याची स्थिती सुदृढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 22:24 IST

Clean Lake, Ganesh Fesival, Nagpur News पर्यावरणप्रेमी संस्था ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनने गणपती विसर्जनाच्या परिणामाचा अंदाज लावण्यासाठी शुक्रवारी फुटाळा, सोनेगाव, शुक्रवारी व सक्करदरा तलावांच्या पाण्याचे परीक्षण केले. परीक्षणानंतर तलावातील पाण्याची स्थिती सुदृढ आढळून आली. या स्थितीवरून, गेल्या आठ वर्षात प्रथमच शहरातील तलावांनी मोकळा श्वास घेतल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देगणपती विसर्जनापूर्वी आणि नंतरच्या जलपरीक्षणात झाला खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरणप्रेमी संस्था ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनने गणपती विसर्जनाच्या परिणामाचा अंदाज लावण्यासाठी शुक्रवारी फुटाळा, सोनेगाव, शुक्रवारी व सक्करदरा तलावांच्या पाण्याचे परीक्षण केले. परीक्षणानंतर तलावातील पाण्याची स्थिती सुदृढ आढळून आली. या स्थितीवरून, गेल्या आठ वर्षात प्रथमच शहरातील तलावांनी मोकळा श्वास घेतल्याचे स्पष्ट झाले.फुटाळा, शुक्रवारी, सोनेगाव तलाव (तिन्ही तलावांचे ४.५ मिलिग्रॅम/लिटर) आणि सक्करदरा तलावात (३ मिलिग्रॅम/लिटर) गणपती विसर्जनापूर्वी आणि नंतर डिसॉल्ड आॅक्सिजन मात्र समान प्रमाणात दिसून आला. गेल्या दोन महिन्यात उत्तम पावसामुळे फुटाळा, सोनेगाव व शुक्रवारी तलाव तुडुंब भरलेले आहेत. त्यामुळेही या तलावांतील गढूळपणा (टर्बिडिटी) काहीअंशी घसरलेला आहे.ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन गेल्या आठ वर्षापासून अर्थ इको इंटरनॅशनल नामक आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत शहरातील प्रमुख तलावांमध्ये गणपती विसर्जनाच्या परिणामाची तपासणी करत असल्याचे टीम लिडर सुरभी जायसवाल यांनी सांगितले. महानगरपालिकेद्वारे या वर्षी सर्वच तलावांमध्ये विसर्जनावर निर्बंध घातल्यामुळेच, हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या वर्षी फुटाळा तलावात ऑक्सिजन मात्रा घसरली होतीगेल्या वर्षी गणपती विसर्जनानंतर फुटाळा तलावाची स्थिती अत्यंत दयनीय होती. येथे डिसॉल्ड आॅक्सिजनची मात्रा घसरून ३.५ मिलिग्रॅम/लिटर पर्यंत पोहोचली होती. शुक्रवारी तलावात ही मात्रा ४ मिलिग्रॅम/लिटरपर्यंत घसरली होती. तलावांमध्ये डिसॉल्ड ऑक्सिजनची मात्रा सर्वसाधारणपणे ६ मिलिग्रॅम/लिटर असायला हवी, असे सुरभी जायसवाल यांनी सांगितले.सक्करदरा तलावाचे परितंत्र धोक्यातसक्करदरा तलावात पाणी कमी आहे आणि चहूबाजूंनी जलकुंभी परसली आहे. त्यामुळे, या तलावाची साफसफाई होणे गरजेचे आहे. अन्यथा तलावाचे परितंत्र पूर्णत: ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरातील प्रमुख तलावांमध्ये कृत्रिम एरेशन सिस्टिम लावण्याची गरज आहे. या सिस्टिममुळे पाण्यातील आॅक्सिजनची मात्रा वाढवणे शक्य असल्याचे ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे डिप्टी टीम लीडर मेहुल कोसुरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Futala Lakeफुटाळा तलावGanesh Mahotsavगणेशोत्सव