शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ठरला अखेरचा शनिवार गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 21:49 IST

शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना २९ फेब्रुवारीपासून आठवड्यात पाचच दिवस काम करायचे आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर निर्णय घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांना खूश केले आहे. या निर्णयानुसार १५ फेब्रुवारीचा शनिवार शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अखेरचा शनिवार ठरला.

ठळक मुद्देपाच दिवसाच्या कामकाजामुळे कर्मचारी खूश : शासनाच्या निर्णयाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना २९ फेब्रुवारीपासून आठवड्यात पाचच दिवस काम करायचे आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर निर्णय घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांना खूश केले आहे. या निर्णयानुसार १५ फेब्रुवारीचा शनिवार शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अखेरचा शनिवार ठरला. शासकीय कर्मचाऱ्यांनीही अखेरच्या शनिवारी आनंदात काम केले आणि सायंकाळी कामकाज संपल्यानंतर शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले.२९ फेब्रुवारीपासून हा निर्णय लागू होत असला तरी, १५ फेब्रुवारीचा शनिवार हा या महिन्यातील तिसरा शनिवार होता. या निर्णयापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुटी असल्याने कामकाजाचा हा अखेरचा शनिवार ठरला. यापुढे कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात शनिवार हा दिवस कधीही कामकाजाचा दिवस म्हणून येणार नाही. पण यातून ज्या सरकारी कार्यालयांना कारखाना कायदा किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक आहे त्यांना या शासन निर्णयाचा लाभ मिळणार नाही.नागपूर जिल्ह्यात राज्य शासनाची २८८ कार्यालये आहे. शहरात बहुतांश कार्यालये सिव्हील लाईन्स परिसरात आहे. एरवी सहा दिवस येथे वर्दळ असायची, पण आता आठवड्यात दोन दिवस या परिसरात शुकशुकाट राहणार आहे. राज्य शासनाचे ३० ते ३५ टक्के कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. २५ ते ३० टक्के कर्मचारी ४० ते ५० वयोगटात आहे. शासनाने २०१२ नंतर मोठ्या प्रमाणात भरतीला ब्रेक लावल्याने, शासकीय कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहे. अतिरिक्त कामांचा भार कर्मचाऱ्यांवर वाढला आहे. त्यामुळे शासनाने दिलेली दोन दिवसाची सुटी योग्य असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. यापूर्वीही झाला होता ५ दिवसाचा आठवडाविशेष म्हणजे महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामाचे ६ दिवस ठरविण्यात आले होते. तेव्हा १०.३० ते ५.३० अशी कामाची वेळ होती. परंतु सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना ५ दिवसाचा आठवडा करण्यात आला होता. जवळपास ६ महिने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवसाच्या सुट्याही मिळाल्या होत्या. परंतु हा निर्णय मागे घेऊन दुसरा आणि चौथा शनिवार सुटी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कामकाजाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ पर्यत वाढविण्यात आली होती. आता परत २९ फेब्रुवारीपासून कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी राहणार आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारEmployeeकर्मचारी